दिवाळखोरी आणि कर्जामुळे 3 वर्षात 16,000 लोकांची आत्महत्या; सरकारने दिली माहिती Saam TV
देश विदेश

दिवाळखोरी आणि कर्जामुळे 3 वर्षात 16,000 लोकांची आत्महत्या; सरकारने दिली माहिती

दिवाळखोरी आणि कर्जामुळे लोकांनी आपला जीव दिले असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं सन 2020 मध्ये दिवाळखोरी किंवा कर्जामुळे 5,213 लोकांनी आत्महत्या केल्या तर 2019 मध्ये 5,908 आणि 2018 मध्ये 4,970 लोकांनी आत्महत्या केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : 2018 ते 2020 दरम्यान दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे देशात जवळपास 16,000 हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत तर बेरोजगारीमुळे 9,140 लोक मरण पावले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityananda Rai) यांनी राज्यसभेत दिली आहे.

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत (RajyaSabha) हे एका लेखी प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी ही आकडेवारी दिली आहे. त्यांनी सांगितले की, 2020 मध्ये 3,548, 2019 मध्ये 2,851 आणि 2018 मध्ये 2,741 लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्याचही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, दिवाळखोरी आणि कर्जामुळे लोकांनी आपला जीव दिले असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं सन 2020 मध्ये दिवाळखोरी किंवा कर्जामुळे 5,213 लोकांनी आत्महत्या केल्या तर 2019 मध्ये 5,908 आणि 2018 मध्ये 4,970 लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT