बालेन शाह यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
गेल्या तीन दिवसांत तीन जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
काठमांडूमध्ये आंदोलन तीव्र झाले असून तरुणांमध्ये सरकारविरोधी नाराजी वाढत आहे.
नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका उडाला आहे. गेल्या तीन दिवसांत तीन जणांना आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक जण गंभीररित्या भाजला गेलाय. विशेष म्हणजे नव्यानं पंतप्रधान बनलेल्या बलेंद्र शाह यांच्याविरुद्धात आंदोलन केले जात असून तरुणांमध्ये त्याच्याविरुद्धात संतापाचा लाट उसळू लागली आहे.
इतकेच नाही तर बालेन शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये तरुण आंदोलन करत आहेत, तर विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसने सरकारवर तरुणांमध्ये आशा आणि आत्मविश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केलाय.
झेन-जी नेपाळ संघटनेने पंतप्रधान बालेन शाह यांच्यावर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप केला आहे. संघटनेच्या मतानुसार तरुणांचा रोजगार आणि उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्प आणि धोरणांमध्ये कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत.२०२३ मध्ये प्रेम आचार्य यांनी केलेल्या आत्मदहनाची घटनाही चर्चेत आहेत. त्यावेळी काठमांडूचे महापौर असलेल्या बालेन शाह यांनी या घटनेला शासनाचे संपूर्ण अपयश म्हटलं होतं.
आता सध्याच्या घटनांवरील त्यांनी मौन पाळल्यानं ते विरोधी पक्ष आणि आंदोलकांच्या निशाण्यावर आले आहेत. नेपाळमधील या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे तरुणांची मानसिकता, बेरोजगारी आणि सरकारी धोरणांविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. जर सरकारने लवकरच प्रभावी कारवाई केली नाही, तर आंदोलने अधिक तीव्र होऊ शकतात, असंही या संघटनेने म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.