vande bharat express saam tv
देश विदेश

Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस तोट्यात? रेल्वेने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर

Vande Bharat Express update : महाराष्ट्राच्या नागपुरात धावणारी नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस आता ८ डब्यांची करण्यात आली आहे. २० डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस ८ डब्यांची करण्यात आली आहे, यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

महाराष्ट्राच्या नागपुरातून धावणारी नागपूर-सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसबाबत रेल्वेने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यक्षमता आणि चांगल्या सेवेसाठी आता ही वंदे भारत एस्क्स्प्रेस ८ डब्यांसह चालवण्यात येणार आहे. रेल्वने संसाधनांचा वापर वाढविण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे १९ फेब्रुवारीपासून २० डब्यांऐवजी ८ डब्यांसह ही वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या निर्णयानंतर ही वंदे भारत एक्स्प्रेस तोट्यात सुरु असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

रेल्वेने प्रवासी संख्याच्या मूल्यांकनावर आधारित हा निर्णय घेण्यात आला आहे. या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये सरासरी ३४% ऑक्युपन्सी दर असल्याने प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी सेवा पुरेशा असतील, याची खात्री केली जाते. गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात माध्यमांनी याबाबत मते मांडली आहेत. सप्टेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत नागपूर - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसची गेल्या ५ महिन्यांची सरासरी प्रवासी संख्या ३३.८१% होती. तर सिकंदराबाद - नागपूर वंदे भारत एक्सप्रेसची प्रवासी संख्या ३३.८७% होती.

वंदे भारतच्या डब्यांच्या संख्येत कपात केल्याने सेवा कार्यक्षमता वाढेल. वेळेत सुधारणा होईल. हाय-टेक रोलिंग स्टॉकचा वापर सुनिश्चित होईल. त्यामुळे वंदे भारत प्रवाशांना उत्तम अनुभव देत राहील, असं रेल्वेचं म्हणणं आहे. भारतीय रेल्वेच्या शाश्वत कामकाज आणि संसाधनांचा विवेकी वापर करण्याच्या वचनबद्धतेशी सुसंगत उपक्रम आहे. यामुळे गरजेनुसार आणि वापरानुसार आधुनिक ट्रेन सेट्स तैनात केल्या जातील याची खात्री होईल, असंही रेल्वेचं म्हणणं आहे.

डब्यांची कपात केल्याने सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही. प्रवाशांना जलद प्रवास, वाढीव आराम आणि अत्याधुनिक विमानातील सुविधांसह जागतिक दर्जाच्या सुविधांचा आनंद घेता येईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे . प्रवाशांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि नेटवर्कमध्ये अखंड दळणवळण प्रदान करण्यासाठी भारतीय रेल्वे वंदे भारत सेवांचा विस्तार आणि सुधारणा करण्यास वचनबद्ध आहे, असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं.

गेल्या ५ महिन्यांतील सरासरी प्रवासी संख्या

महिना नागपूर - सिकंदराबाद वंदे भारत सिकंदराबाद - नागपूर वंदे भारत

सप्टेंबर -२४ २२.५९% २२.४४%

ऑक्टोबर-२४ २७.८६ % ४९.८२%

नोव्हेंबर-२४ ४०.६९% २७.८५%

डिसेंबर-२४ ३८.३१% ३१.१९%

जानेवारी-२५ ३२.९६% ३२.५१%

५ महिन्यांची सरासरी ३३.८१% ३३.८७%

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT