देश विदेश

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा पेटलं! २ दिवसात ७ जणांचा मृत्यू; ३ जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट सेवाही बंद

Bharat Jadhav

देशातील उत्तर पूर्व दिशेकडील मणिपूर राज्यात पु्न्हा एकदा हिंसाचार उसळलाय. राज्यातील तीन जिल्ह्यात संचार बंदी लागू केल्यानंतर येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. इम्फाळ पूर्व, इंफाळ पश्चिम आणि थौबल तीन जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आलाय. दरम्यान राज्यात मागील दोन दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे.या २ दिवसांत ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

त्यानंतर तीन जिल्ह्यांच्या प्रशासनाने मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश जारी केलेत. संचारबंदी का केली यामागे बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था हे कारण सांगितले. इंटरनेटवरही ५ दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

वृत्तानुसार,सोमवारी वेगवेगळ्या ठिकाण हिंसेच्या घटना घडल्या. एक महिला आणि माजी सैनिकाची हत्या करण्यात आली होती.हत्या करण्यात आलेले व्यक्ती हे कुकी समुदायाचे होते. हे कांगपोकोपी जिल्ह्यातील रहिवाशी होते. तर महिलेचा मृतदेह थांगबह गावातील एका चर्चेच्या बाहेर आढळून आला. या महिन्यात ११ जणांचा बळी गेल्याचं सांगितलं जात आहे. ज्या माजी सैनिकाची हत्या झाली होती. त्या सैनिकाचं अपहरण करण्यात आलं होतं. त्या सैनिकांचा मृतदेह इम्फाळच्या पश्चिम भागातील जिल्ह्यातील सेकमाई गावात आढळून आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How to Clean Black Kadhai : जेवण करपल्याने काळी झालेली कढई मिनिटांत चकचकीत चमकेल; ट्राय करा 'हा' उपाय

Wada Crime News : इंस्टाग्रामवरुन प्रेमाच्या जाळ्यात ओढले; मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्या तरूणाला अटक

Romantic Place In Thane: ठाण्यातील 'या' प्रसिद्ध ठिकाणी कपल्स होतात रोमँटिक, खुलेआम करतात प्रपोज

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस,अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद

VIDEO : गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक इमारतीचे छत कोसळले, ३० ते ४० महिला जखमी

SCROLL FOR NEXT