लखीमपूर हिंसाचार प्रकरणी कारवाई; केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाविरुद्ध एफआयआर Saam Tv
देश विदेश

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी कारवाई; केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाविरुद्ध एफआयआर

यूपीतील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसक चकमकीनंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला

विहंग ठाकूर

वृत्तसंस्था : यूपीतील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसक चकमकीनंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविवारी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर खेरी येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, त्याआधी तेथे गोंधळ झाला. एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी टीकोनिया पोलीस स्टेशनमध्ये अजय मिश्राचा मुलगा आशिष याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोप करण्यात आला आहे,  की जेव्हा शेतकरी निषेधासाठी गेले होते. त्याचवेळी कारने त्यांना तुडवले. या दरम्यान, ४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर हिंसाचारात एकूण ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या प्रकरणी आशिष मिश्रा यांच्यासह १४ जणांविरोधात खून, गुन्हेगारी कट आणि दंगल यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी त्यांचा मुलगा आशिष मिश्रा गाडी चालवत असल्याचा आरोप फेटाळला आहे.अजय मिश्रा यांनी काही समाजकंटकांना दोष दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT