Rajnath Singh Saam Tv
देश विदेश

India China Dispute : तवांगमध्ये नेमकं काय घडलं, संरक्षण मंत्र्यांनी संसदेत दिली माहिती

तवांगमधील घटनेवर संरक्षणमंत्री काय काय म्हणाले?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचा मुद्दा आज संसदेत गाजला. विरोधकांनी चर्चेची मागणी करत संसदेत गदारोळ केला. दरम्यान, या मुद्द्यावर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी संसदेत उत्तर दिलं आहे. (Rajnath Singh on Tawang Clash)

चीनने 9 डिसेंबर रोजी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चीनला आपल्या देशात परत जावे लागले. या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या चकमकीत एकही भारतीय जवान शहीद झाला नसून कोणीही जवान गंभीर जखमी झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी आपलं लष्कर कटिबद्ध आणि सज्ज आहे. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे असे देखील राजनाथ सिंग म्हणाले.

मला खात्री आहे की हे सभागृह आपल्या सैन्याच्या शौर्याला आणि धैर्याला एकमताने पाठिंबा देईल. चीनच्या बाजूने अशा कारवाईपासून मनाई करण्यात आली असून सीमेवर शांतता राखण्यास सांगितले आहे. हा मुद्दा चीनच्या बाजूने राजनैतिक पातळीवरही मांडण्यात आला आहे.

तवांग येथे भारताची चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत लेखी निवेदन वाचून दाखवले. ते म्हणाले, 9 डिसेंबर रोजी पीएलएच्या सैनिकांनी तवांग सेक्टरच्या यांगत्से भागात घुसखोरी केली. भारतीय जवानांनी या प्रयत्नाला खंबीरपणे तोंड दिले. भारतीय जवानांनी धैर्याने या परिस्थितीचा सामना केला आणि चिनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लातूरमध्ये पावसाचा हाहाकार! अनेकांचे संसार उघड्यावर; दोन गावांना पुरानं वेढलं, ७० शेळ्या, ७ बैल वाहून गेले

Heavy Rain : अकोला जिल्ह्याला पावसाने झोडपले; गावांमध्ये शिरले पाणी, वाडेगाव ते बाळापुर वाहतूक बंद

आर्थिक अडचण आलीय? UPI दूर करणार तुमची समस्या, बँकेत न जाता मिळेल Loan

Thane : मोठी बातमी! मंगळवारी पावसाचा रेड अलर्ट, ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी

INDIA Alliance vs Election Commission:मतचोरीचा वाद टोकाला! इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आणणार महाभियोग, काय असते प्रक्रिया?

SCROLL FOR NEXT