People Died Due To Heatstroke Saam Tv
देश विदेश

Heat Wave Alert: उत्तर भारतात उष्णतेचा कहर; एका दिवसात ४० जणांचा उष्माघाताने मृत्यू, राज्यात काय स्थिती?

People Died Due To Heatstroke: उत्तर भारतात उष्मघातामुळे एका दिवसांत ४० लोकांचा मृत्यू झाला आहे. चार राज्यांतील ही आकडेवारी आहे.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा तडाखा पाहावयास मिळत आहे. उष्माघातामुळे काल (३१ मे) एका दिवसात चार राज्यांमध्ये ४० जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक १७, बिहारमध्ये १४, ओडिशामध्ये ५ आणि झारखंडमध्ये चारजणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या ७२ तासांत १८२ लोकांचा मृत्यू हा उष्णतेच्या लाटेने झाल्याची माहिती मिळत आहे.

अयोध्येत तीन दिवसांत १८ बेवारस मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण उष्माघात असल्याचं मानले जात आहे. आज देशात कुठेही उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट (Heat Wave Alert) जारी करण्यात आलेला नाही. पण राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, ओडिशा आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

राज्यात काल (३१ मे) एका संशयिताची उष्मघातामुळे मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. २८ मे रोजी भंडारा जिल्ह्यातील भास्कर तरारे नावाचा इसम शेतात म्हशी चरावयास घेऊ गेला (People Died Due To Heatstroke) होता. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात मृत्यूचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सदर मृत्यू उष्मघाताने झाला की नाही, यासंदर्भात कळवलं जाणार असल्याचं आरोग्य विभागाकडून खुलासा करण्यात आला आहे.

दरम्यान, नागपुरातील सहा मृत्यू उष्मघातामुळे झाला नसल्याचा आरोग्य विभागाकडून खुलासा करण्यात आला ( Maharashtra Temperature Update) आहे. यातील तीन व्यक्तींसंदर्भातील अहवाल मागवण्यात येणार असल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं (Weather Update) आहे. मार्च महिन्यापासून उष्माघातामुळे राज्यात २८१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नाशिकमध्ये २९, जालन्यात २८, बुलढाण्यात २३, धुळ्यात २० तर सोलापुरात १९ सर्वाधिक उष्मघाताचे रुग्ण आढळले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guruwar che Upay: गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूंचे हे उपाय अवश्य करा; अशुभ प्रभावातून मिळेल सुटका

Pakistan Vs India: पाकिस्तानचे राज्यकर्ते का माजले? अमेरिकेच्या अणुबॉम्बवर पाकच्या उड्या?

Independence Day: 15 ऑगस्टला मांसाहारावर बंदी का? पालिकांचा मटणबंदीचा तुघलकी फतवा

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विठ्ठल- रूक्मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई

Airtel: कमी किंमतीत जास्त डेटा! महिन्याचा प्लॅन ६० जीबी डेटा आणि जबरदस्त बचत

SCROLL FOR NEXT