Government Employees  
देश विदेश

Government Employees: लेट येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना दणका; थेट पगार कापणार, केंद्र सरकारचा निर्णय

Government Employees: कार्यालयात उशिराने येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे. केंद्र सरकारने उशिराने येणाऱ्या कर्माचाऱ्यांचा पगार कपात करण्याचा निर्णय घेतलाय.

Bharat Jadhav

केंद्र सरकारने उशिराने कार्यलयात येणाऱ्या सरकारी बाबूंना चाप बसवण्यासाठी एक नवा नियम आणलाय. प्रत्येक कार्यालयाच्या गेटवर बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. या नव्या बदलामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर यावं लागणार आहे. बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सकाळी ९: १५ वाजेपर्यंत कार्यालयात हजर राहणं आवश्यक आहे.

लेट लतिफांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. बायोमेट्रिकमुळे कर्मचाऱ्यांना वेळेत हजर राहावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांना आता ९:१५ वाजेपर्यंत कार्यालयात यावे लागणार आहे. कर्मचारी जास्तीत जास्त १५ मिनीट उशिराने येऊ शकतात. जर कर्मचारी १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळाने उशिराने आले तर त्यांचा अर्ध्या दिवासांची रजा लावली जाणार असल्याने त्यांना अर्ध्या दिवसाचा पगार कापला जाईल,अशा इशारा देण्यात आलाय. चार वर्षांपूर्वी कोविड-१९ च्या उद्रेकानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक प्रणाली वापरणे बंद केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा ही प्रणाली सुरू करण्यात आलीय.

जर कर्मचारी एखाद्या दिवशी कामावर हजर राहू शकला नाही तर त्याला कॅज्युअल रजेच्या अर्ज द्यावा लागेल. शासकीय कर्मचारी उशीरा येतात तर काही जण लवकर वेळेआधी निघून जातात, अशा कर्मचाऱ्यांना चाप बसवण्यासाठी सरकारने ही प्रणाली सुरू केलीय. केंद्र सरकारची कार्यालये साधारणपणे सकाळी ९ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत काम करतात. पण कर्मचारी लवकर निघून जात असल्याने लोकांची गैरसोय होत असते.

दरम्यान सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र या प्रणाली विरोध केलाय. कार्यालयीन वेळ निश्चित नाहीये. ते सहसा संध्याकाळी ७ नंतर निघून जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अनेकवेळा आम्ही घरातून काम करतो. कामाचे तास निश्चित नाहीये. बहुतेक वेळा सुट्टी असतानाही कामे करावी लागत असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gambhir: अर्शदीपला माफी मागायची गरज नव्हती, फायनलमधील झालेल्या राड्यावर गौतम स्पष्टच बोलला

Monalisa Wedding: कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाने पळून जाऊन केलं लग्न, कोण आहे तिचा नवरा? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

LPG Gas : घरगुती गॅस सिलिंडरवर ३०० रूपयांची सूट, पण कशी? कुणाला मिळणार लाभ? वाचा सविस्तर

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT