मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदानात झालेल्या कथित मतचोरीच्या आरोपांमुळे देशभरातील राजकारण तापलंय.विरोधकांकडून निवडणूक आयोगाला आरोपीच्या त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी केलीय.
निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचं पुनरीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या संदर्भातील घोषणा सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेमधून करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांच्या नेतृत्वात या संदर्भात माहिती दिली जाणार आहे. मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये १० ते १५ राज्यांचा समावेश केला जाणार आहे.
मतदार यादी पुनरीक्षण ही मतदार याद्यांना अपडेट केलं जाणार. त्यामध्ये नव्या मतदारांची नोंदणी, मृत मतदारांची नावं हटवणे. बनावट मतदारांची नावं हटवणे तसेच मतदार यादीतील नावांचे स्थलांतरण अशी कामे केली जाणार आहेत.
भारतीय निवडणूक आयोग आगामी काळात मतदान होऊ घातलेल्या राज्यांमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये २०२६ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या राज्यांमधील मदतार याद्यांचं पुनरीक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
निवडणूक आयोगाच्या सर्व्हरच्या सुरक्षिततेबद्दल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते. आयोगाचा सर्व्हर दुसरे कुणीतरी बाहेरून ऑपरेट करत असल्याचा दावा जयंत पाटलांनी केला आहे. तर भाजपचे पदाधिकारी असलेले देवांग दवे हे आयोगाची वेबसाईट हाताळतात, असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.