Election Commission 
देश विदेश

Election Commission: हरियाणा निवडणुकीत गडबड झाली? काँग्रेसच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं उत्तर, १६०० पानी पत्रात काय म्हटलं, जाणून घ्या

Election Commission: हरियाणा निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसला निवडणूक आयोगाने फटकारलंय. तुमच्या बेजबाबदार आरोपांमुळे अशांतता आणि अराजकता निर्माण होऊ शकते, असं म्हणत निवडणूक आयोगाने काँग्रेसला फटकारलंय.

Bharat Jadhav

हरियाणा निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. या आरोपांवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलंय. निवडणुकीबाबत काँग्रेसने केलेल्या आरोपांना तथ्य नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलंय. काँग्रेसचे आरोप निराधार, खोटे आणि तथ्यहीन असल्याचं म्हणत फेटाळून लावलेत. एवढेच नाही तर निवडणूकीनंतर बिनबुडाचे आरोप करणे बंद करण्यासाठी आयोगाने काँग्रेस पक्षाला पत्रही लिहिलंय.

'सामान्य' संशय पसरवल्याबद्दल निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला फटकारलं. अशी प्रवृत्ती रोखण्यासाठी काँग्रेसने ठोस आणि ठोस पावले उचलावीत, असे आवाहन आयोगाने केलंय. मतदान आणि मतमोजणी अशा संवेदनशील दिवशी बेजबाबदारासारखे आरोप केल्याने सार्वजनिक अशांती, अराजकता निर्माण करून शकते असंदेखील निवडणूक आयोगाने केलीय.

गेल्या एका वर्षातील पाच विशिष्ट प्रकरणांचा हवाला देऊन, निवडणूक आयोगाने प्रदीर्घ अनुभव असलेल्या राष्ट्रीय पक्षाला योग्य परिश्रम घेण्यास सांगितले. कोणत्याही पुराव्याशिवाय निवडणूक आचारसंहितेवर हल्ला करणे टाळले,पाहिजे असं निवडणूक आयोगाने म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

SCROLL FOR NEXT