election commission press conference August 17 saam tv
देश विदेश

Election Commission press conference : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार की आणखी काही...

election commission press conference August 17 : राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांनंतर निवडणूक आयोग उद्या रविवारी (१७ ऑगस्ट २०२५) पत्रकार परिषद घेणार आहे. आगामी निवडणुकांबाबत काही घोषणा होण्याची शक्यता असून, एसआयआर आणि मतचोरीच्या आरोपांवर आयोगाकडून उत्तरे दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Nandkumar Joshi

  • निवडणूक आयोग उद्या (१७ ऑगस्ट) महत्वाची पत्रकार परिषद घेणार

  • राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर आयोग उत्तर देण्याची शक्यता

  • आगामी निवडणुकांबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता

केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या रविवारी दुपारी तीन वाजता दिल्लीत महत्वाची पत्रकार परिषद होत आहे. निवडणूक आयोगाचे डायरेक्टर जनरल (मीडिया) यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. आगामी निवडणुकांसंबंधी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच एसआयआर आणि राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना उत्तरे देण्याची शक्यता आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या वतीने बिहारमध्ये 'व्होट अधिकार' यात्रा सुरू करण्यात येणार आहे. ६ दिवस ही यात्रा काढणार आहेत. १३०० किलोमीटरची ही यात्रा जवळपास २५ जिल्ह्यांतून जाणार आहे. या यात्रेत इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख पक्षांचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तेजस्वी यादव देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्याचवेळी निवडणूक आयोगाकडून उद्याच महत्वाची पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यामुळे आयोगाच्या या पत्रकार परिषदेला महत्व प्राप्त झाले आहे.

मतचोरीच्या आरोपांना उत्तर?

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला होता. या आरोपांनंतर देशातलं राजकारण ढवळून निघालं होतं. आता या आरोपांना निवडणूक आयोग उत्तरे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून मतदारयाद्यांमधील घोळ आणि मतचोरीचा आरोप करून निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

मतचोरीच्या आरोपांचं सत्र सुरूच

गेल्या काही महिन्यांपासून, विशेषतः २०२४ मधील लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर विरोधी पक्षांनी मतदारयाद्यांमध्ये कथितरित्या घोळ झाल्याचा आरोप केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ७ ऑगस्टला नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकातील बेंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाचा हवाला देताना जवळपास एक लाखांहून अधिक मतांची चोरी झाल्याचा दावा केला होता.

मतदारयाद्यांमध्ये बोगस मतदार, बनावट पत्ते, एकाच पत्त्यावर शेकडो मतदारांची नावे अशा प्रकारचे अनेक आरोप करण्यात आले. जर हा घोळ झाला नसता तर कदाचित कर्नाटकात काँग्रेस १६ जागांवर विजयी झाला असता, असा दावा करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT