दिल्लीतील लालकिल्ल्या जवळ झालेल्या बाँब ब्लास्ट नंतर संपूर्ण देशात हायलर्ट देण्यात आला असून नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे रेल्वे जंक्शन असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकात काल रात्री पासून रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस अलर्ट मोडवर असल्याचे पहावयास मिळत असून संपूर्ण रेल्वे परिसर डॉग स्क्वाड द्वारे प्रवाशांच्या सामानाची तपासणी करत आहे,तर रेल्वे फलाटावर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे
दिल्ली येथे लाल किल्ल्या समोर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना सुरक्षेच्या कारणास्तव देण्यात आलेल्या हाय अलर्ट नंतर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरामध्ये कडक सुरक्षा पाहायला मिळत आहे.श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक आलेल्या भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश देताना पूर्णपणे तपासणी करून सोडले जात आहे.एक्स रे स्कॅनर मशीनच्या माध्यमातून भाविकांच्या बॅग आणि पर्स आणि इतर साहित्याची कडक तपासणी केली जात आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पर्यटन आणि देवस्थान स्थळावर यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. खुलताबाद तालुक्यातील भद्रा मारुतीच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकांची तपासणी करून दर्शनासाठी आज सोडलं जात आहे. भद्रा मारुतीच्या दर्शनाला राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून हनुमान भक्त येत असतात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठीची खबरदारी सध्या पोलिसांच्या वतीने घेण्यात आली आहे.
दिल्ली लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बलास्टच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मालेगावात देखील हायअलर्ट देण्यात आला आहे. त्याचा विचार करता मालेगावात पोलिस प्रशासन देखील अलर्ट झाले आहे. अती संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या मालेगावचा दोन बाँबस्फोटचा इतिहास बघता हा हायअलर्ट दिल्याचे बोलले जात आहे. मात्र यासाठी पोलिस प्रशासनान पूर्णपणे सज्ज आहे. रात्रीच पोलिसांनी विविध हॉटेल, लॉजिंग वर छापा सत्र केले.. तसेच रस्त्यावर बेरिगेट लावत संशयित वाहनांची तपासनी देखील करण्यात आली.
अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर येथे देखील पोलीस प्रशासनाकडून भाविकांच्या वाहनांची आणि भाविकांची कसून तपासणी
शनिशिंगणापूर येथे राज्यातूनच नाही तर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात दर्शनाला
त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचं विशेष लक्ष
दिल्ली स्पोट प्रकरणात प्रकाश आंबेडकरांची अकोल्यातून मोठी प्रतिक्रिया समोर आलीये.. आंबेडकरांनी थेट सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढलेये. ते अकोला येथे बोलत होतेय. या स्फोटामागे बाह्यशक्ती किंवा अंतर्गत शक्तीचा हात आहे का? याचा सखोल तपास झाला पाहिजे.. सर्व गोष्टी पूर्णपणे उघड झाल्या पाहिजे, अशी मागणी आंबेडकरांनी केलीय... दरम्यान, देशात ठीक-ठिकाणी झालेल्या स्पोटचा उल्लेख करत आंबेडकरांनी संघाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंये. बिहार निवडणुकीतील मतदानाच्यावेळी स्फोट झाल्याने टाईमिंगसंदर्भात संशय व्यक्त होत असल्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केलीय.
दिल्लीमध्ये झालेला हल्ला भ्याड आहे. एकालाही सोडणार नाही. रात्रभर या घटनेची माहिती घेतली असून यंत्रणेला योग्य त्या सूचना दिल्या आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हल्ल्याचा सखोल तपास केला जाईल. कुणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मंोद ीयांन ीदिला आहे.
लाल किल्लाजवळ झालेल्या कारच्या स्फोटातील मृताची संख्या १३ वर पोहचली आहे. चार ते पाच मृतदेहांची ओळख पटलेली नाही.
दिल्लीमधल्या दुर्घटनेनंतर मतदार रेल्वे द्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकमान्य टिळक टर्मिनल दादर पुणे नागपूर अशा स्थानकांचा समावेश होतो या सर्व स्थानकावर ती आरपीएफ आणि जीआरपी यांच्या मार्फत जास्त घातली जाते ती वाढवली जात गेली आहे. तैनात करण्यात आले आहेत. येणाऱ्या प्रवाशांची देखील काळजीपूर्वक चौकशी आणि तपासणी केली जात आहे. आपल्याला जर आसपास जर कोणती वस्तू किंवा संसद व्यक्ती दिसल्यास त्याची माहिती प्रशासनाला द्यावी त्याच्या माध्यमातून आपण परिसर सुरक्षित करू शकतो.स्वप्निल नीला
दिल्ली येथील बॉम्बस्फोट घटनेनंतर पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात पोलिसांनी हाय अलर्ट दिला आहे. आज सकाळपासूनच विठ्ठल मंदिर परिसरात पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे येथे दररोज हजारो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विठ्ठल मंदिर परिसरामध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर बंदूकधारी पोलीसांची सुरक्षा देण्यात आली आहे. याबरोबरच मंदिर परिसरातील सगळे रस्ते मोकळे करण्यात आले आहेत.
दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वे पोलीस सतर्क झालेय..
रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिस सुरक्षा बल अलर्ट मोडवर
रेल्वे पोलिसांसह नाशिकरोड पोलिसांकडूनही सतर्कता
ये जा करणाऱ्या प्रवाशांवर आणि संशयास्पद हालचालींवर पोलिसांचं लक्ष
दिल्लीला झालेल्या ब्लास्टचे पार्श्वभूमीवर देशासह राज्यात अलर्ट जारी करण्यात आला असून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानकावर ही सुरक्षा वाढविली आहे .. येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची कसून चौकशी तसेच बॅग ची तपासणी करण्यात येत आहे .. तसेच प्रवाशांना सूचना देण्यात येत आहेत की संशयित वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास रेल्वे पोलिसांना कळवावे
कोकणातल्या 525 लँडिंग पॉईंट वरती सुरक्षा अधिक कडक
पोलीस आणि तटरक्षक दलाकडून सागरी गस्त
कोकणातील 525 लॅण्डिंग पाॅईंट संवेदनशील जाहिर
समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारी नौकांवर बारिक लक्ष्य
बॉम्ब शोध नाश पथक आणि श्वान पत्रकाकडून किनारी सुरक्षा तपासणी
सागरी महामार्गावरून जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांची करडी नजर
येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची होती तपासणी
मुंबईवर 26 /11 चा हल्ला झाला त्यावेळी भाजपने असेच प्रश्न उपस्थित केले होते. आता त्यांनी याचे उत्तर दिले पाहिजे, आम्हाला यात राजकारण करायचा नाही पण देशाच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे.नाना पटोले
दिल्लीत ब्लास्टनंतर रेल्वे प्रशासन तर्फे रेल्वे स्टेशनवरती हाय अलर्ट करण्यात आले. भुसावळ जळगाव या रेल्वे स्टेशन वर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस वतीने स्टेशन परिसरात व प्रवासी रेल्वे गाड्यांची डॉग स्पॉट्स सहा कसून चौकशी करण्यात येत आहे.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सूत्रांनुसार, अमीर आणि उमर या दोन भावांना पुलवामा येथून ताब्यात घेऊन श्रीनगरला आणण्यात आले आहे. तपासात असे दिसून आले आहे की स्फोटात वापरलेली कार डॉ. उमरची होती, जो जम्मू आणि काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी नुकताच उघड केलेल्या त्याच दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित आहे. तारिक अहमद दारने पुलवामाच्या अमीरला कार विकल्याची कबुली दिली आहे. नंतर ती डॉ. उमरला दिली. पोलिस तिघांची चौकशी सुरू केली आहे.
लाल किल्ला स्फोटापूर्वीचे काही फोटो पोलिसांच्या हातात आले आहेत. संशयित आय-२० कार दुपारी ३:१९ वाजता सुनेहरी मशिदीजवळील पार्किंगमध्ये गेली आणि सुमारे तीन तास तिथेच उभी राहिली. गाडी संध्याकाळी ६:४८ वाजता पार्किंगमधून बाहेर पडली आणि काही मिनिटांनीच स्फोट झाला. स्फोटापूर्वी काढलेले हे छायाचित्र तपास यंत्रणांसाठी महत्त्वाचा पुरावा मानले जाते.
दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर पुणे शहरातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट
शहरातील महत्त्वाच्या संवेदनशील ठिकाणी हालचालींवर लक्ष
दिल्ली घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्तांनी ही सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचा दिल्या सूचना
शहरातील रेल्वे स्टेशन बस स्थानके मॉल सिनेमा थेटर धार्मिक स्थळे गर्दीच्या भागांमध्ये पोलीसगस्ट वाढवला
पुणे शहरातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष
दिल्लीतील घटनेनंतर महाराष्ट्र पोलिस मुख्यालयाकडून सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीही सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानके, विमानतळ, मॉल्स, सिनेमा थिएटर्स, धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे.
पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरा बाहेरील सुरक्षाही वाढवण्यात आली
दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे व गर्दीच्या ठिकाणांना विशेष अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशभरात प्रसिद्ध असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरातही पोलिसांनी विशेष खबरदारी घेत छावणीचा स्वरूप दिलेला आहे प्रत्येक भाविकाची मेटल डिटेक्टर च्या माध्यमातून तपासणी करून आज सोडण्यात येत आहे तर मंदिर परिसरात शीघ्रकृतिदल व पोलिसांचा मोठा पहारा लावण्यात आलेला आहे या ठिकाणी सशस्त्र पोलीसही नेमण्यात आले आहे.
दिल्ली येथे झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस सतर्क झाले असून शहरात सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्टेशन तसेच परिसरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले आहे.
कल्याण पोलीस दलाकडून स्टेशन परिसर, बसस्थानक, बाजारपेठ, हॉटेल्स, लॉज आणि गर्दीच्या ठिकाणांची कसून तपासणी करण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून वाहने आणि संशयास्पद व्यक्तींची काटेकोर चौकशी केली जात आहे.
दिल्ली बॉम्ब ब्लास्ट नंतर पिंपरी चिंचवड शहर पोलिस हाय अलर्ट वर आहेत. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त आणि नाका बंदी लावण्यात आली आहे. तसेच महामार्गावरून आणि रस्त्यावरून ये जा करणाऱ्या चार चाकी वाहनांची पोलीस कसून तपासणी करत आहेत.
कारपासून पार्किंगच्या संपूर्ण परिसर मेटल डिटेक्टरने सामान्यांची तपासणी केली जात आहे. डॉग्सस्कॉडकडून सामानाची प्रवाशांचे तपासणी केली जातेय. रेल्वेगाड्यातही तपासणी केली जात आहे. लोहमार्ग पोलिसांनी 30 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्त लावला असून दोन बीडीएस कोड असे एकूण 45 जवानांच्या बंदोबस्त रात्रीपासून लावला आहे.
नागपूरमधील मुख्य रेल्वे स्थानकावर जीआरपी आणि आरपीएफकडून सुरक्षा व्यवस्था अलर्ट मोडवर आहे. बॉम्बस्फोट पथक, डॉग्स कोड पथकाकडून तपासणी केल्या जात आहे. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर आणि संवेदशील व्यक्तींवर नजर ठेवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.