Farmers News Saam tv
देश विदेश

Modi Government : शेतकऱ्यांची 'धन-धन' दिवाळी; खिशात येणार पैसाच पैसा, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Farmer News : रब्बीतील सहा महत्वाच्या पिकांवरील किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

प्रविण वाकचौरे

New Delhi :

हवामानाचा लहरीपणा, नापिकी, शेतमालाला मिळणारा कमी भाव आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून कर्जाच्या वाढत जाणाऱ्या डोंगराखाली दबलेल्या बळीराजाला केंद्रातील मोदी सरकारनं दिवाळीआधीच गोड बातमी दिली आहे. रब्बीतील सहा महत्वाच्या पिकांवरील किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. (Latest Marathi News)

केंद्र सरकारने 6 रब्बी पिकांसाठी एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमत 2 टक्क्यांवरून वरून 7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाला सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली.

गहू आणि मोहरीसह 6 पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गहू, जौ, हरभरा, मसूर, सूर्यफूल आणि मोहरी या मुख्य रब्बी पिकांचे एमएसपी वाढवण्यात आले आहेत. मसूर आणि मोहरीच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाबद्दल माहिती देताना म्हटलं की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड पटीने वाढवणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तेलबिया आणि मोहरीच्या भावात प्रति क्विंटल 200 रुपये, मसूर 425 रुपये, गहू 150 रुपये, जौ 115 रुपये, हरभरा 105 रुपये, आणि सूर्यफुलाला प्रतिक्विंटल 150 अधिकचा दर मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही या ५ गोष्टी करू नका; अन्यथा...

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र '

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT