Bihar Weather Saam TV
देश विदेश

Bihar Temprature: बिहारमध्ये उष्णतेचा कहर! 24 तासांत उष्माघाताने 16 जणांचा मृत्यू, तापमान 48 अंशापार

16 People Died Due To Heat Stroke In Bihar: बिहारमध्ये सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. बिहारमध्ये तापमान वाढत असून यामुळे नागरिकांना उष्णाघाताचा त्रास होऊ लागला आहे. उष्माघाताने 24 तासांत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

Priya More

बिहारमध्ये उन्हाचा पारा (Bihar Heat Wave) दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बिहारमधील उष्णतेच्या लाटेने मागचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. वाढते तापमान आणि उकाड्यामुळे बिहारमधील नागरिक हैराण झाले आहेत. बिहारमध्ये उष्णतेने कहर केला असून नागरिकांना उष्णाघाताचा त्रास होऊ लागला आहे. बुधवारी बिहारमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे वेगवेगळ्या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ३३७ जणांना उष्माघाताचा त्रास झाला. तर २४ तासांमध्ये १६ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

वाढते तापमान लक्षात घेता बिहार सरकार आणि हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिहारच्या दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-मध्य भागात एक-दोन ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान खात्याने याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर राज्याच्या उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व भागात एक-दोन ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या नैऋत्य-पश्चिम पाटणामध्ये एक-दोन ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज बिहारच्या नालंदामध्ये होमगार्ड जवान आणि बेगुसराय येथे एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला.

गुरूवारी बिहारमधील बक्सर, भोजपूर, रोहतास, भभुआ, औरंगाबाद आणि अरवल येथे कमाल तापमान ४६ अंश ते ४८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर दक्षिण मध्य पाटणा, गया, नालंदा, शेखपुरा, नवादा, बेगुसराय, लखीसराय, जहानाबाद येथे कमाल तापमान ४४ ते ४६ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. २४ तास हवामान कोरडे होते. दक्षिण बिहारमधील बहुतांश भागात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत पाटणा ४२.८ अंश सेल्सिअस, गया ४६.८ अंश सेल्सिअस, भागलपूर ३९ अंश सेल्सिअस आणि पूर्णिया ३७ अंश सेल्सिअस तापमान होते.

बिहारमधील वाढत्या तापमानाचा फटका शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षकांना बसला. बुधवारी अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांना उष्माघाताचा त्रास झाला. बिहिरच्या बेगुसराय आणि शेखपुरा या जिल्ह्यांतील शाळांमधील विद्यार्थ्यांना उष्णाघाताचा त्रास झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वाढते तापमान लक्षात घेता बिहारमधील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ३० मे ते ८ जूनपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भगवान शंकराच्या गळ्याभोवती नाग का आहे?

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीला उपवास करताय? मग 'हा' एक पदार्थ खाण्याची करू नका चूक

Gold Rate Today : 'व्हॅलेंटाईन डे'ला सोनं महागलं, प्रतितोळा ₹१९७०ने वाढले, वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

Maharashtra Live News Update : सकाळपासून मंत्री नरहरी झिरवळ नॉटरिचेबल

Mumbai Water Metro: मुंबईत वाहतुक कोंडीला टाटा-बायबाय, १० जलमार्गे मेट्रो धावणार, प्रस्ताव अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT