Bihar Politics  
देश विदेश

Nitish Kumar: भाजपचा मित्रपक्ष महाआघाडीत जाणार? लालू प्रसाद यादव यांची नितीश कुमार यांना ऑफर

Bihar Politics: महाराष्ट्रातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट सीएम पदाची ऑफर दिली होती. त्यामुळे राजकारणात मोठी चर्चा रंगली. त्याचदरम्यान बिहारमध्ये भाजपच्या मित्रपक्षाला लालू प्रसाद यादव यांनी ऑफर दिलीय.

Bharat Jadhav

होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. पटोले यांच्या ऑफरने राज्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली. आता अशीच ऑफर बिहारमधील भाजपचे मित्र नितीश कुमार यांना मिळालीय. त्यामुळे नितीश कुमार पुन्हा एकदा उडी मारणार असल्याची चर्चा आहे.

एकत्र येणार

नितीश कुमार एनडीएची साथ सोडत पुन्हा महाआघाडीत जाणार असल्याची चर्चा होण्याचे कारण आहे, लालू प्रसाद यादव यांचं विधान. होळीच्या निमित्ताने लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना ऑफर दिलीय. या ऑफरमुळे आणि राज्यातील वाढत्या हिंदुत्वाच्या वातावरणामुळे नितीश कुमार पुन्हा पलटी मारतील,अशी चर्चा आहे.

प्रत्येक जुनी गोष्ट विसरून सोबत नवी सुरुवात करू. प्रेम आणि आपुलकीच्या भावनेने समाजाला पुढे नेऊ, असं विधान लालू प्रसाद यादव यांनी केलं होतं. त्यांनी केलेलं विधान हे नितीश कुमार यांच्यासाठी होतं, अशी चर्चा आहे. दरम्यान याआधीही लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार एका सामाजिक न्यायासाठी कधीकाळी एकत्र आले होते.

राजदचे दरवाजे कायम खुले

त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत बिहारच्या राजकारणात मोठी उलटफेर होणार असल्याची शक्यता आहे. राजकीय जाणकारांच्या मते, लालू प्रसाद यादव यांचे विधान हे एकप्रकारे नितीश कुमार यांना ऑफर देणारं आहे. त्यामुळे ते महाआघाडीत परत जातील अशी शक्यता जाणकरांनी वर्तवलीय. बिहारमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

तर नितीश कुमार हे पुरोगामीचं राजकारण करतात. काही महिन्यांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमारांसाठी दरवाजे बंद नाहीत. त्यांच्यासाठी राजदचे दरवाजे कायम खुले असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या ऑफरमुळे नितीश कुमार परत एकदा पलटी मारतील असं म्हटलं जात आहे.

नितीश कुमार यांची 'नो गॅरंटी'

नितीश कुमार कधीही पलटतील. येथे त्यांची काही गॅरंटी नाही असं विधान विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी बिहारच्या अधिवेशनात केलं होतं. त्याआधी लालू प्रसाद यादव यांनी २ जानेवारीला नितीश कुमारांसाठी दरवाजे खुले असल्याचं म्हटलं होतं.पाटलीपुत्रचे खासदार मीसा भारती यांनीही असेच काहीसे विधान सुचक संकेत दिलेत. राजकारणात सर्व काही शक्य असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. नितीश कुमार भाजपाच्या दबावात आहेत. राजकारणात कुणीही कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. राजकीय परिस्थितीचा खेळ असतो. त्यामुळे बिहारमध्ये पु्न्हा भूकंप होऊ शकतो, राजदचे नेते वीरेंद्र म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT