Ayodhya Accident News
Ayodhya Accident News SAAM TV
देश विदेश

Ayodhya Accident : भीषण! जोरदार धडकेनंतर ट्रक उलटून बसवर कोसळला; ७ जणांचा मृत्यू, ४० हून अधिक जखमी

Nandkumar Joshi

Ayodhya Accident News : उत्तर प्रदेशातील अयोध्येत भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. अयोध्येतून आंबेडकर नगरच्या दिशेने जाणारी बस आणि भरधाव ट्रकची जोरदार धडक झाली. त्यानंतर ती बस उलटली. या अपघातात ४० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

लखनऊ-गोखपूर राज्यमार्गावर हा अपघात झाला. या घटनेनंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू केले. (Latest Marathi News)

पोलिसांच्या माहितीनुसार, बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रक उलटून बसवर कोसळला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भीषण अपघातात (Accident) आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातानंतर दहा-बारापेक्षा अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. या अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी या दुर्दैवी घटनेवर दुःख व्यक्त केले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करून त्यांना सर्वोत्तम उपचार मिळावेत, असे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत.

बलरामपूरमध्येही एकाच कुटुंबातील ६ जण ठार

काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये भीषण अपघात झाला होता. कारला झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये तीन मुलांचाही समावेश होता. हे पीडित कुटुंब देवरिया जिल्ह्यातील रहिवासी होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना नोटीस

Uddhav Thackeray: इंडिया आघाडी सत्तेत आल्यास तुम्ही पंतप्रधान बनणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आमचं ठरलंय की...'

Chess Playing Benefits: बुद्धिबळ खेळण्याचे जाणून 'घ्या' फायदे

अमरावती : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पांढरा कांदा झाला काळा; चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक नुकसान

Manoj jarange Patil: 'दिलेला त्रास विसरु नका, मतांमधून ताकद दाखवा', जरांगे पाटलांचे आवाहन; विधानसभेबाबत केली मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT