झारखंड: झारखंडच्या Jharkhand लातेहारमध्ये Latehar एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील बालूमाथमध्ये कर्मा विसर्जनादरम्यान 7 मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे देखील पहा-
घटना बालूमाथ पोलीस स्टेशन परिसरातील घडल्याची माहिती आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कर्मा दल विसर्जनादरम्यान ७ मुली बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत मुलींचे वय १० ते २० वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच बालूमाथ पोलिसांनी Balumath Police घटनास्थळी धाव घेतली. सध्या मृतदेह पोस्टमार्टमसाठी Postmortem रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
मृतांपैकी तीन मुली सख्ख्या बहिणी;
मिळालेल्या माहितीनुसार, ७ मृतांपैकी त्यातील ३ मुली या सख्ख्या बहिणी होत्या. सातही मृत मुली शेरेगडा गावातील मननडीह टोला या भागातील रहिवासी होत्या.
याबद्दल गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्म दल विसर्जनासाठी मुली तोरी-बाळूमठ-शिवपूर रेल्वेमार्गाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात गेल्या होत्या. या दरम्यान वाईट घटना घडली. घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले. बुडालेल्या मुलींना बाहेर काढले. मात्र ७ मुलींचा आधीच मृत्यू झाला होता.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.