Rajasthan google
देश विदेश

Rajasthan: 150 फूट बोअरवेलमध्ये अडकलेल्या 5 वर्षीय मुलाचा मृत्यू, 55 तास चालले बचावकार्य

Rajasthan: राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात ३ दिवसांपासून अडकलेल्या ५ वर्षाच्या निष्पाप आर्यनचा मृत्यू झाला आहे.

Dhanshri Shintre

राजस्थानच्या दौसा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिथे १५० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या पाच वर्षांच्या मुलाला 55 तासांहून अधिक लांब ऑपरेशननंतर वाचवण्यात आले. मुलाला बेशुद्ध अवस्थेत रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रकृती खालावली होती. राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात ३ दिवसांपासून अडकलेल्या ५ वर्षाच्या निष्पाप आर्यनचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन नावाचा हा मुलगा सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कालीखड गावातील एका शेतात खेळत असताना बोअरवेलमध्ये पडला. तासाभरानंतर बचावकार्य सुरू झाले. मुलापर्यंत पोहोचण्यासाठी ड्रिलिंग मशीन वापरून समांतर खड्डा खोदण्यात आला.

या प्रकरणात, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या जवानांनी सांगितले की, ऑपरेशनमध्ये अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले, ज्यामध्ये पाण्याची मोठी समस्या होती, ज्यात अंदाजे 160 फूट पाण्याची पातळी आहे. यासोबतच त्यांनी सांगितले की, भूमिगत वाफेमुळे मुलाच्या हालचाली कॅमेऱ्यात टिपण्यात अडचण आणि बचाव कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही या ऑपरेशनमधील आव्हानांपैकी एक होता. अधिकाऱ्याने सांगितले की, मुलांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले आहे. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

खरं तर हा मुलगा आईसोबत शेतात खेळत होता. आई पाण्याच्या टाकीजवळ काम करत होती. यावेळी खेळता खेळता तो उघड्या बोअरवेलमध्ये पडला. या घटनेने एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे की, बोअरवेल सारख्या प्रकल्पांचा वापर करताना अत्यंत खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसंच, यापुढे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने याबाबत कडक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

IIM Mumbai Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IIM मुंबईत नोकरी; विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai : मंत्रालयातील त्या लिपिकावर कारवाई; तोपर्यंत काम थांबवलं, नरहरी झिरवळ यांचे निर्देश

Rajya Sabha : विनोद तावडे खासदार होणार? भाजपकडून ५ नावाची चर्चा

SCROLL FOR NEXT