बारामती शहरात निसर्गाचा अद्भुत नजरा मंगेश कचरे
मुंबई/पुणे

बारामती शहरात निसर्गाचा अद्भुत नजरा

बारामती शहरात आज निसर्गाचा अद्भुत नजरा पाहायला मिळाला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सूर्याभोवती सप्तरंगी तेजोमय कडे निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश कचरे

बारामती - शहरात आज निसर्गाचा अद्भुत नजरा पाहायला मिळाला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सूर्याभोवती Sun सप्तरंगी Rainbow तेजोमय कडे निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. तब्बल तास दोन तासाहून अधिक काळ सूर्याभोवती कडे निर्माण झाले होते. गुरुवारी सकाळपासून बारामतीत Baramati ढगाळ वातावरण होते. त्यात अधूनमधून ऊन सावलीचा खेळ सुरु होता. त्यातच सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सुर्याभोवती स्पतरंगाचे गोलकडे पडल्याचे दिसून नागरिकांना आले. Wonderful view of nature in Baramati city

हे देखील पहा -

बारामती शहरात आज सकाळपासूनच तापमानात वाढ झाली आहे. त्यातच दुपारी बाराच्या सुमारास सूर्याभोवती सप्त रंगाचे आवरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले मनाला भुरळ घालणारे हे दृश्य पाहण्याचा नागरिकांना मोह  आवरला नाही.  अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये सप्तरंगाने वलयांकित सूर्याची छायाचित्रे टिपली. यासंदर्भात ज्येष्ठ खगोलतज्ञ डॉ. प्रकाश तुपे म्हणाले की ज्यावेळी  पाणी असलेले ढग सूर्याच्या आड येतात. त्यावेळी त्या ढगातील पाण्याच्या स्फटीकातून सूर्यकिरणे परावर्तित होतात आणि त्यामुळे सूर्याभोवती सप्तरंगाचे कडे निर्माण होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT