Nitesh Rane Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेना वाढवण्यात उद्धव ठाकरेंचं काय योगदान?; नितेश राणेंचा सवाल

मुंबईची अवस्था २५ -३० वर्ष शिवसेनेनं काय केली हे समजावे म्हणून ही पोलखोल सभा आयोजित करण्यात आल्याचे राणे म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज मुंबईत भाजपतर्फे (BJP)पोल खोल मेळावा वांद्रे येथील रंगशारदा येथे आयोजित करण्यात आला होता. या सभेत बोलताना आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शिवसेना (Shivsena) वाढवण्यात उद्धव ठाकरेंचे काय योगदान आहे, असा सवाल राणे यांनी केला. मुंबईची अवस्था २५ -३० वर्ष शिवसेनेनं काय केली हे समजावे म्हणून ही पोलखोल सभा आयोजित करण्यात आल्याचे राणे (Nitesh Rane) म्हणाले.

यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, हाजी भाईंनी एवढे बॅनर लावले म्हणून शिवसेनेने (Shivsena) पोलिसांना त्रास द्यायला सुरुवात केली. हाजींना मी सांगतोय चार पाच बाहेर बॅनर कमी करा, आणि मातोश्रीबाहेर एलईडी लावा जेणेकरून मुख्यमंत्री आमचे भाषण ऐकतील, असंही नितेश राणे म्हणाले. गेली अडीच वर्ष हे सरकार आहे ते लोकांसाठी चाललेलं नाही. ही फक्त ठाकरे सरकार नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू आहे. किती येतात आणि कोण काय घेऊन येतो यावर हे सरकार अवलंबून आहे, असंही राणे (Nitesh Rane) म्हणाले.

ठाकरे सरकार लोकांना लुटत आहे. बाकी काहीच सुरू नाही. आपल्या राज्याला परिवहन मंत्री आहे का?, ते अनिल परब मातोश्रीचे परिवार मंत्री आहे, असा टोलाही राणे यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना राणे म्हणाले, आता धर्मवीर नावाचा सिनेमा पहा कारण त्यात तुम्हाला कळेल, शिवसेना घडवण्यात उद्धव ठाकरेंचे काय योगदान होते ते, शेवटी कसे येतात पाहा. या सिनेमात राज ठाकरे आणि राणे साहेब येतात त्यांच्या मागे ते कसे येतात पाहा. उद्धव ठाकरे या सिनेमाचा शेवट न बघता निघून गेले. राणे साहेब आणि राज ठाकरे स्वतःच्या भावाला स्क्रिनवर बघावे लागू नये म्हणून ते निघून गेले, असा टोलाही राणे (Nitesh Rane) यांनी लगावला.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: त्सुनामी म्हणजे काय आणि ती इतकी घातक का असते? जाणून घ्या माहिती

Maharashtra Live News Update: राज्यातील पाऊस झाला कमी, विदर्भाला येलो अलर्ट

Crime News : दुचाकीवरून आले, तरुणीला उचलून नेलं अन्...; धक्कादायक कारण आलं समोर, घटनेचा VIDEO व्हायरल

लालपरीतून ओलाचिंब प्रवास; बसमध्येच पावसाचं पाणी गळायला लागल्याने चालकावर प्रवाशांने धरली छत्री

Tariff: वस्त्रोद्योग, हिरे, दागिने अन् बरंच काही; टॅरिफचा भारताला बसणार फटका; या क्षेत्रांवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT