Vijay Wadettiwar  Saam TV
मुंबई/पुणे

''भूमिका समाज जोडणारी असावी, दंगलीत जाणारा राजकारण्याचा पोरगा नसतो''

गुढीपाडव्याला राज ठाकरेंची सभा शिवाजा पार्कवर पार पडली आणि त्यानंतर राज्यात धार्मीक तेढ निर्माण झाली.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुबंई: गुढीपाडव्याला राज ठाकरेंची सभा शिवाजा पार्कवर पार पडली आणि त्यानंतर राज्यात धार्मीक तेढ निर्माण झाली. राज ठाकरेंच्या मुस्लीम समाजाविरोधातील भूमिकेने राज्यातील आणि पक्षातील मुस्लीम नाराज आहेत. अनेक मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. आता काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्राचे इतर मागासवर्गीय मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) त्यांची भूमिका झेंड्यातील रंगाप्रमाणे बदलतात. किती वेळा राज ठाकरे यांनी भूमिका बादलली आहे? जनता दूध खुळी नाही. भाजप सरकारच्या काळात मशिदीवर भोंगे नव्हते का? राज ठाकरे यांची भूमिका समाजात भांडणं लावणारी असल्याचं मत वडेट्टीवारांनी व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी महत्त्वाचं विधान केले आहे. दंगलीत जाणारा राजकारण्याचा पोरगा नसतो. कार्यकर्त्याला पुढे केले जाते. समाज जोडणारी भूमिका असावी देश तोडणारी भूमिका नसावी असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

''न्यायालयात दूध का दूध पाणी का पाणी होईलच''

अनिल देशमुख यांची चौकशी आता सीबीआयकडे देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की व्यक्तिगत द्वेष व तशी भूमीका कोणी ठेवता कामा नये. हे लोकशाहीला हे पोषक नाही. कायदा आणि न्यायालयात दूध का दूध पाणी का पाणी होईलच. राजकारणात मतभेद होऊ शकतात. द्वेष भावना ठेवू नयेत. CBI ची चौकशी होऊ द्या. 90 वेळा धाडी टाकल्या काय मिळाले हे माहीत नाही. काँग्रेसमध्ये गृह खात्यावर नाराजी नाही कोणी बोलले असतील तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका असेल असे वडेट्टीवार म्हणाले.

मोदी-पवार भेट जनतेच्या हितासाठी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट झाली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चाच- चर्चा झाली. विजय वडेट्टीवर यांनी या भेटीकडे सकारात्मक पाहावे असे म्हणाले आहेत. दोन मोठ्या नेत्यांच्या भेटीचा चुकीचा अर्थ लावणे योग्य नाही. मोदी-भाजपचे नाही देशाचे पंतप्रधान आहेत या भूमिकेतून त्यांच्याकडे बघावे. काय चर्चा झाली याचे अंदाज वर्तवणे चुकीचे आहे. या भेटीकडे सकारात्मक बघावे.

जनतेच्या हितासाठी चर्चा झाली असावी. देशातील महागाई बाबत या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी. निवडणूकी आधी एक आणि नंतर एक अशी महागाई वाढत आहे. जनतेच्या भावना त्यावर उपाय योजना यावर शरद पवार यांनी मोदींना सूचना केली असेल असे वडेट्टीवार म्हणाले. त्याचबरोबर शिवसेनेचा इतिहास मोठा आहे. सरकारच्या तिन्ही पक्षाचा व्यक्तीशा अजेंडा वेगळा आहे असेही ते म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

SCROLL FOR NEXT