Raj Thackeray-Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray On Alliance With MNS: मनसेकडून युतीचा प्रस्ताव आल्यास दोन्ही ठाकरे एकत्र येणार का?, उद्धव ठाकरे यांनी स्पष्टचं सांगितलं

Uddhav Thackeray On Raj Thackeray: सामनाला दिलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागामध्ये उद्धव ठाकरे यांनी ठाकरे- मनसे (Thackeray And MNS Alliance) एकत्र येणार का याबाबत सांगितलं.

Priya More

Uddhav Thackeray Interview: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय घडामोडींनंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावे याबाबतच्या चर्चांनी जोर धरला. दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे यासंदर्भात राज्यभरामध्ये बॅनरबाजी देखील करण्यात आली.

दोन्ही ठाकरे एकत्र येणार का? याबाबत चर्चा सुरु असताना आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याबाबत स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. सामनाला दिलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागामध्ये उद्धव ठाकरे यांनी ठाकरे- मनसे (Thackeray And MNS Alliance) एकत्र येणार का याबाबत सांगितलं.

संजय राऊत यांनी विचारलेल्या दोन्ही भाऊ एकत्र येतील का? या चर्चेला काही आधार आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, 'आधार असता तर चर्चा थांबलीच नसती ना. आपणच म्हणता त्याप्रमाणे चर्चा झाली आणि चर्चा थांबली. ज्याने कोणी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असेल त्याला आधारा मिळाला नाही म्हणून चर्चा थांबली असेल.'

तर मनसेकडून युतीचा प्रस्ताव आला तर? या प्रश्नावर देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, 'मी आला तर... गेला तर... यावर कधीच विचार करत नाही. गेला तरी विचार करत नाही आणि आला तरी विचार करत नाही. त्या क्षणाला काय असतं त्याचा विचार करतो. त्यामुळे आता तशी काही चर्चा नाही. त्यामुळे असं बोलण्याची काही आवश्यकता नाही.' या उत्तराच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

या मुलाखतीच्या दुसऱ्या भागातही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने विरोधकांच्या महाआघाडीला परिवार वाचवण्यासाठी एकत्र आले असल्याची टीका केली होती. या टिकेला उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले. 'परिवार वाचवणारे सगळे विरोधक तिकडे एकत्र आले आहेत. मग तुम्ही सत्ता वाचवायला एकत्र आलात का?' असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.

तसंच, 'जसं बंगळुरूला परिवार वाचवण्यासाठी ही लोकं एकत्र आली असं त्यांचं म्हणणं आहे. मी ठामपणे म्हणतो, होय... परिवार वाचवण्यासाठी एकत्र आलोत. माझा देश माझा परिवार आहे. हेच माझं हिंदुत्व आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही संकल्पना मी कोविड काळात राबवली होती. तीच आज देशभरात राबवण्याची वेळ आली आहे, की ‘माझा देश माझी जबाबदारी’ आहे.' असं उद्धव यांनी स्पष्टपणे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT