मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आलाय
ठाकरे गटाला धक्का बसलाय
मुंबईत २५ वर्षानंतर सत्तांत्तर
महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर विविध वृत्तसंस्थाचे एक्झिट पोल हाती येऊ लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं होतं. मुंबई महापालिका निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर 'आजतक' हिंदी वृत्तवाहिनीचा एक्झिट पोलचा हाती आला आहे. या एक्झिट पोलमध्ये ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. २५ वर्षांनंतर ठाकरेंनी मुंबईची सत्ता गमावल्याचे पोलमध्ये पाहायला मिळत आहे. दोन्ही शिवसेनेच्या तुलनेत ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीला ५८ ते ६८ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीला १२ ते १६ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर अन्य पक्षाला ६ ते १२ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एक्झिट पोलनुसार, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला ४२ टक्के मते मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. ठाकरे बंधूंना ३२ टक्के मते मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे.
एक्झिट पोलनुसार, मुंबईमध्ये भाजप मोठा पक्ष ठरत आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ठाकरे गट पाहायला मिळत आहे. त्यापाठोपाठ शिंदे गट पाहायला मिळत आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या जागा कमी होण्याच्या शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला जास्तीत जास्त १६ जागा दाखवण्यात येत आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपने यंदा जागा राखल्याचे पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.