Ulhasnagar News अजय दुधाणे
मुंबई/पुणे

आदिवासी पाड्यांना मिळणार शुद्ध पाणी!उल्हासनगर जवळीळ हजारो नागरिकांना लाभ

सोहम फाऊंडेशनने उल्हासनगर (Ulhasnagar) जवळीळ आदिवासी पाड्यांमध्ये शुद्ध पाण्याची यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे या परिसरातील तीन हजारांहून अधिक रहिवाशांना नियमितपणे शुद्ध पेयजल मिळू लागले आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर - अशुद्ध आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावपाड्यांमधील रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यावर मात करण्यासाठी सोहम फाऊंडेशनने उल्हासनगर (Ulhasnagar) जवळीळ आदिवासी पाड्यांमध्ये शुद्ध पाण्याची यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे या परिसरातील तीन हजारांहून अधिक रहिवाशांना नियमितपणे शुद्ध पेयजल मिळू लागले आहे. ग्रामीण भागात अजूनही हजारो रहिवासी विहीरी आणि कुपनलिकांचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पितात.

हे देखील पहा -

अनेकदा अशा पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार आणि विषारी घटक असतात. त्यामुळे रहिवाशांना आरोग्याच्या अनेक उद्भवत होत्या. त्यामुळे सोहम फाउंडेशनने पाण्यातील अशुद्ध घटक वेगळे करणारी शुद्धीकरण यंत्रणा म्हसकळ, गोवेली आणि अनखर या तीन पाड्यांमध्ये बसविण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे दर तासाला दोन हजार लिटर शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळते. सध्या सुरूवातीचे सहा महिने संस्थेतर्फे या योजनेचे विनामूल्य व्यवस्थापन केले जाणार आहे.

याकाळात ग्रामस्थांकडून कोणत्याही स्वरूपाची शुल्क न घेता त्यांना विनामूल्य पाणी दिले जाईल. दरम्यानच्या काळात गावातील महिला बचत गटाला या शुद्धीकरण प्रकल्पाची इत्यंभूत माहिती दिली जाणार आहे, किरकोळ, देखभाल दुरूस्तीचे प्रशिक्षणही महिलांना दिले जाईल. सहा महिन्यानंतर गावातील महिला या योजनेची देखभाल करणार आहेत. तेव्हा मात्र रहिवाशांना अत्यल्प का होईना पाणीपट्टी द्यावी लागेल. त्याच लोकवर्गणीतून योजनेचा देखभाल खर्च भागवला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे सत्र न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल २९ जूनला देणार

Lohgad Case: ‘केतन जिवंत आहे’ ऐकताच सियाचा थरकाप उडाला थरकाप; लोहगड तरूणाच्या हत्येप्रकरणी मोठा गौप्यस्फोट समोर

Qutb Minar : जगातील सर्वात उंच विटांची मिनार! कुतुब मिनारला 'कुतुब' नाव कसे मिळाले? वाचा खास कनेक्शन

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

Nasrapur Case Verdict : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाने दिला निकाल, नराधम भीमराव कांबळे अखेर दोषी

SCROLL FOR NEXT