ट्रेनला उशीर तर रेल्वे जबाबदार, प्रवाशांना द्यावी लागेल भरपाई: सुप्रीम कोर्ट Saam Tv
मुंबई/पुणे

ट्रेनला उशीर तर रेल्वे जबाबदार, प्रवाशांना द्यावी लागेल भरपाई: सुप्रीम कोर्ट

ट्रेनला ठराविक वेळेत आणि ठराविक ठिकाणी पोहोचण्यास उशीर जर झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी आता रेल्वेची असणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - ट्रेनला Train उशीर झाल्यास रेल्वेच जबाबदार असणार आहे आणि प्रवाशांना त्याची भरपाई देखील द्यावी लागेल असा निर्णय सुप्रीम कोर्टाने Supreme Court घातला आहे. ट्रेनला ठराविक वेळेत आणि ठराविक ठिकाणी पोहोचण्यास उशीर जर झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी आता रेल्वेची असणार आहे. यासाठी रेल्वेला प्रवाशांना भरपाई द्यावी लागेल, असा निर्णय सुप्रीम दिला आहे.

हे देखील पहा -

सार्वजनिक वाहतुकीला खासगी क्षेत्राशी स्पर्धा करायची असेल, तर त्याला व्यवस्था आणि कार्यशैली सुधारणं आवश्यक आहे असे मत सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. तसेच प्रवाशाला ३०,००० रुपये भरपाई देण्यास सांगण्यात आले आहे. ट्रेनला उशीर झाल्यास रेल्वे आपली जबाबदारी सोडू शकत नाही. रेल्वे प्रवाशांना विलंबाचे कारण कळवण्यात अपयशी ठरली तर प्रवाशांना भरपाई द्यावी लागेल, असा निकाल न्यायमूर्ती एम.आर. शाह आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने दिला आहे.

आपल्या देशातील जनता, प्रवाशी सरकारच्या दयेवर अवलंबून राहू शकत नाहीत. याची जबाबदारी कुणाला तरी घ्यायला हवी, असे मत देखील सुप्रीम कोर्टातील खंडपीठाने नोंदवले आहे. २०१६ मध्ये रेल्वेला उशीर झाल्याने नियोजित विमान प्रवास करता न आल्याने हजारो रुपयांचा फटका एका कुटुंबाला बसल्याचा प्रकार घडला होता. हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले होते. यात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी; ११ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Nora Fatehi : 'घाणेरडे लिरिक्स, डान्स अन्...' ; अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, नोरा फतेही-संजय दत्तच्या गाण्याने संताप

Dehydration Signs: तुम्ही पुरेसं पाणी प्यायला नाहीत हे कसं समजतं? शरीर देतं ही 5 संकेत

Mumbai Crime: मुंबई हादरली! मनसे कार्यकर्त्याकडून तरुणाची हत्या, भररस्त्यात धारदार शस्त्राने सपासप वार

SCROLL FOR NEXT