ट्रेनला उशीर तर रेल्वे जबाबदार, प्रवाशांना द्यावी लागेल भरपाई: सुप्रीम कोर्ट Saam Tv
मुंबई/पुणे

ट्रेनला उशीर तर रेल्वे जबाबदार, प्रवाशांना द्यावी लागेल भरपाई: सुप्रीम कोर्ट

ट्रेनला ठराविक वेळेत आणि ठराविक ठिकाणी पोहोचण्यास उशीर जर झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी आता रेल्वेची असणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - ट्रेनला Train उशीर झाल्यास रेल्वेच जबाबदार असणार आहे आणि प्रवाशांना त्याची भरपाई देखील द्यावी लागेल असा निर्णय सुप्रीम कोर्टाने Supreme Court घातला आहे. ट्रेनला ठराविक वेळेत आणि ठराविक ठिकाणी पोहोचण्यास उशीर जर झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी आता रेल्वेची असणार आहे. यासाठी रेल्वेला प्रवाशांना भरपाई द्यावी लागेल, असा निर्णय सुप्रीम दिला आहे.

हे देखील पहा -

सार्वजनिक वाहतुकीला खासगी क्षेत्राशी स्पर्धा करायची असेल, तर त्याला व्यवस्था आणि कार्यशैली सुधारणं आवश्यक आहे असे मत सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. तसेच प्रवाशाला ३०,००० रुपये भरपाई देण्यास सांगण्यात आले आहे. ट्रेनला उशीर झाल्यास रेल्वे आपली जबाबदारी सोडू शकत नाही. रेल्वे प्रवाशांना विलंबाचे कारण कळवण्यात अपयशी ठरली तर प्रवाशांना भरपाई द्यावी लागेल, असा निकाल न्यायमूर्ती एम.आर. शाह आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने दिला आहे.

आपल्या देशातील जनता, प्रवाशी सरकारच्या दयेवर अवलंबून राहू शकत नाहीत. याची जबाबदारी कुणाला तरी घ्यायला हवी, असे मत देखील सुप्रीम कोर्टातील खंडपीठाने नोंदवले आहे. २०१६ मध्ये रेल्वेला उशीर झाल्याने नियोजित विमान प्रवास करता न आल्याने हजारो रुपयांचा फटका एका कुटुंबाला बसल्याचा प्रकार घडला होता. हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले होते. यात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil: ज्या गोष्टींमध्ये मी नाही, त्यात मला दोष देऊ नका; गौतमी पाटीलने केली विनंती|VIDEO

Hingoli ZP School : जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाची मनमानी; कारभाराविरोधात शिक्षणाधिकारी शाळेच्या समोर करणार उपोषण

Banking Alert News : आरबीआयची सोलापूरमधील बँकेवर मोठी कारवाई, कर्ज, ठेवी आणि गुंतवणुकीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?

माझी साक्षी कुठं गेली? कॉलेजवरून घरी आली, खोलीत गेल्यानंतर...; MBBS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या, आईने फोडला टाहो

Jio Recharge Plan: ८४ दिवसांसाठी जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन; कॉलिंग, मेसेजिंग अन् बरंच काही, किंमत किती?

SCROLL FOR NEXT