राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित अश्विनी जाधव- केदारी
मुंबई/पुणे

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत तुकाराम सुपे यांचे मुख्यालय पुणे येथे राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

मुंबई - महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत तुकाराम सुपे यांचे मुख्यालय पुणे येथे राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

हे देखील पहा -

निलंबित असताना सुपे यांनी खाजगी नोकरी स्वीकारणे अथवा इतर कुठलाही व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि तदनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

सन 2019-20 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेमध्ये केलेल्या गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना १६ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. सुपे यांना अटक करून ४८ तासापेक्षा अधिक कालावधी झाला असून ते अद्यापपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

ओट्स की दालिया? वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला काय खावे?

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार, एकाच कुटुंबातील तिघांसह ६ जणांचा मृत्यू

Terror Attack : जम्मू- काश्मीरमध्ये मोठा दहशवादी हल्ला, नाव विचारून गोळ्या झाडल्या; 2 जणांचा मृत्यू

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या वर्षभरातच गाशा गुंडाळला, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT