शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे काळाच्या पडद्याआड; पुण्यात निधन
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे काळाच्या पडद्याआड; पुण्यात निधन Saam TV
मुंबई/पुणे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे काळाच्या पडद्याआड; पुण्यात निधन

अश्विनी जाधव - केदारी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाले आहे. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते त्यांच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी ५.०७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बळवंत मोरेश्वर पुरंदरे (जन्म 29 जुलै 1922) हे बाबासाहेब पुरंदरे म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. भारतातील एक चांगले लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होते. 25 जानेवारी 2019 रोजी त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

त्यांचं बहुतांशी लेखक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित घटनांवर आधारित आहे. त्यांना शिवशाहीर म्हणून संबोधले जात होते. त्यांना मुख्यतः जाणता राजा या लोकप्रिय नाटकासाठी ओळखले जाते. ते केवळ महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेश आणि गोव्यातही लोकप्रिय होते. पुरंदरे यांनी पुण्याच्या पेशव्यांच्या इतिहासाचाही अभ्यास केला आहे. माधव देशपांडे आणि माधव मेहेरे यांच्यासह १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण योगदानासाठीही त्यांना ओळखले जाते. 2015 मध्ये त्यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर भीषण जलसंकट; फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Crime News: शिवी दिल्याच्या रागातून भयंकर कांड.. चौघांनी मिळून जिवलग मित्राला संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Mother's Day 2024 : एक दिवस फक्त आईसाठी; 'मदर्स डे' ला तुमच्या माऊलीला द्या हे सुंदर सरप्राईझ

Today's Marathi News Live : भाज्यांचे दर कडाडले, किलोमागे तब्बल ८० रुपयांपर्यंत वाढ; अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा फटका

SCROLL FOR NEXT