Uddhav Thackeray saam tv
मुंबई/पुणे

Maratha Reservation : महाराष्ट्राची एकजूट दाखवा; मराठा आरक्षणाचा मुद्दा थेट PM मोदींसमोर मांडा; राज्यातील केंद्रीय मंत्र्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहन

Maratha Reservation Andolan : महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची ही वेळ असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

प्रविण वाकचौरे

Maratha Aarakshan News :

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील खासदारांनी आणि केंद्रीय मंत्र्यांनी आरक्षणाचा मुद्दा पंतप्रधान मोदींसमोर मांडण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची ही वेळ असल्याचं  उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मांडला पाहिजे. आता थेट पंतप्रधान मोदींना म्हटलं पाहिजे, आतापर्यंत तुमची मन की बात ऐकली, आता जनतेचं म्हणणं ऐका. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवा. अन्यथा राजीनामा देतो, असं केद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधानांना थेट सांगितलं पाहिजे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा

विधीमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊन विषय सुटत असेल तर जरुर घ्या. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणाचा विषय लोकसभेत सोडवण्यासारखा आहे. आमदार आणि खासदार यांनी राजीनामा देऊन काही फरक पडणार नाही. संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा. केंद्रात तोडगा निघाला नाही तर ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा.

महाराष्ट्राची ताकद काय ते दाखवून द्या, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसेच हा मुद्दा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला जायला केव्हाही तयार आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

राज्य पेटलं असताना उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त

मराठा आरक्षणाविषयीची काल बैठक पार पडली. त्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते. एकाला डेंग्यू झालाय तर दुसरे प्रचाराला बाहेर होते. देवेंद्र फडणवीस यांना प्रचार महत्त्वाचा वाटतोय. राज्य पेटलं असताना उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहे, असे लोक आरक्षण देऊ शकतात का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

मराठा तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये

मनोज जरांगे यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, टोकाचं पाऊल उचलू नये. तुमची समाजाला गरज आहे. तरुणांनी देखील आत्महत्या करुन नये. हिंसक आंदोलन करु नये. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम आधीच सुरु आहे. मराठा समाजाला न्याय हक्क मिळालाच पाहिजे, यात दुमत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT