मुंबई: शिवसेनेतील (ShivSena) बंडानंतर माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. आज आमदार ठाकरे यांचा कुडाळ येथे शिवसंवाद यात्रा सुरू आहे. या दौऱ्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांसह भाजपवर टीका केली आहे. संजय राऊत यांच्या अटकेवर बोलताना राऊत म्हणाले, 'महाराष्ट्राचा आवाज दाबण्यासाठी हे सर्व सुरु आहे. संजय राऊतांची अटक हे कटकारस्थान आहे. बंडखोरी झालेल्या ४० जागांवर निवडणुका घ्या मग बघू अस आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
कोकणात भरपूर आम्ही कामे केली आहेत. चीपीच्या विमानतळासाठी काम केले, श्रेयवादासाठी अनेकजण पुढे आली. तुम्ही आज सर्वांनी लिहून घ्या हे सरकार थोड्या दिवसांनी कोसळणार आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.
मी जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा पहिला निर्णय मी कोकणासाठी घेतला आहे. कोकणातील पर्यटनासाठी कामे केली. मी अनेकदा कोकणात पावसाळ्यात येतो. राज्यात दोन लोकांचे जम्बो मंत्रिमंडळ आहे. मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण हेच कळत नाही, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.
हे देखील पाहा
हे सरकार गद्दारांचे सरकार आहे. देशात सध्या बेरोजगारी वाढत आहे. यावर कोण काही करत नाही, तर आपल्या देशात पक्षफोडीची कामे सुरू आहेत, असा आरोपही भाजपवर केला. ठाकरे परिवार कधीही संपणार नाही. समोर असलेले हे ठाकरे परिवार आहे. कोकणाचा आवाज म्हणजे शिवसेनेचा आवाज आहे. बंडखोरांनो राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असं म्हणत त्या ४० लोकांसाठी अजूनही मातोश्रीचे दरवाजे अजूनही उघडे आहेत, असंही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.