Maharashtra Election: इंडिया आघाडीचं सरकार आलं तर कोण होणार पंतप्रधान? पटोलेंनी उघडं केलं गुपित
(अक्षय बडवे, पुणे)
Nana Patole Press Conference : यंदाची लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीविरुद्ध पंतप्रधान मोदी अशी रंगलीय. आपल्या प्रत्येक सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी 'इंडिया' आघाडीच्या स्थिती आणि पंतप्रधान पदाच्या दाव्यावरून टीका करत असतात. त्यावर नाना पटोलेंनी उत्तर दिलंय. राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान होतील. इंडिया आघडीत असं आधीच ठरलेलं आहे. इंडिया आघाडीत राहुल गांधीच आमचे नेते आहेत, दावा नाना पटोले यांनी केलाय.
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले एका पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचार सभेत इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत असतात. इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाहीये. तेथील प्रत्येक पंतप्रधानपदाचा दावा करत करतात,असा हल्लाबोल मोदी करतात. यावर नाना पटोले यांनी उत्तर आमचा पंतप्रधान आधीच ठरल्याचं म्हटलंय. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील इंडिया आघडीत, असं आधीच ठरलेल्याचं त्यांनी सांगितलं. पण नाना पटोले यांच्या दाव्यामुळे 'इंडिया' आघातील इतर पक्षांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
मोदींच्या भाषणावर पटोलेंचा हल्लाबोल
पंतप्रधान मोदींची राज्यातील भाषणं बघा पाण्यावर शेतीवर काहीच बोलत नाहीत. पंतप्रधान शेतकरी आत्महत्या यावर बोलतच नाहीत. जे लोक सोबत आहेत त्यांच्या कारखाना पाहिला आणि २०० कोटी रुपये देण्यात आले इतरांवर मात्र कारवाई केली गेल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय.
पंतप्रधान मोदींना काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून टीका केली. परंतु मोदींना आमचा जाहीरनामा कळला नाहीये. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना जाहीरनामा समजून सांगण्यासाठी वेळ मागितलाय. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही धर्माचा नाहीतर जातीचा उल्लेख केला आहे. पण मोदी लोकांची दिशाभूल करत आहेत, त्यांनी लोकांची दिशाभूल करू नये असं नाना पटोले म्हणालेत. पंतप्रधान मोदींनी देशात धर्माच राजकारण केलं. धर्मावर देशाची फाळणी करण्याचं काम मोदी करत असल्याचा आरोप सुद्धा नाना पटोलेंनी केलाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.