Eknath Shinde Reaction on Samriddhi Highway Accident Saam TV
मुंबई/पुणे

Samruddhi Mahamarg: शहापूर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Eknath Shinde Reaction on Samriddhi Highway Accident: अपघात अत्यंत दुर्देवी असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Eknath Shinde Reaction on Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम सुरू असताना ठाण्यातील शहापूर तालुक्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली. पुलावरून अचानक ग्रेडर मशिन कोसळून २० ते २५ कामगार दबले गेले. यातील १७ कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं.

शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर क्रेन कोसळून झालेला अपघात अत्यंत दुर्देवी असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर घटनेतील जखमींना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. समृद्धी महामार्गावरील क्रेन दुर्घटनेचं वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून घटनेविषयी जाणून घेतले. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्यासही त्यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एन डी आर एफ चे पथक याठिकाणी पोहचले असून योग्य रीतीने बचाव कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.

अपघाताची चौकशी करण्याचे फडणवीसांचे आदेश

दरम्यान, या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केलं. "शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत."

"या घटनेत ३ कामगार जखमी झाले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत", असं ट्वीट करत घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

SCROLL FOR NEXT