Maratha Reservation News: Saam tv
मुंबई/पुणे

Saamana Editorial : 'मराठा आरक्षणाचा पेच महाराष्ट्राच्या गळ्याला लागलेला फास', 'सामना'तून विचारलेल्या १० प्रश्नांची सरकार उत्तरे देणार का?

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

मराठा आरक्षणासाठी ९ दिवसांपासून सुरु असलेलं आंदोलक  मनोज जरांगे-पाटील यांनी काल २ नोव्हेंबर रोजी मागे घेतलं. सरकारला २ जानेवारीपर्यंतचा वेळ द्यावा, अशी विनंती सरकारने केली होती. सरकारची ही विनंती जरांगे-पाटील यांनी मान्य केली. मात्र उपोषण सुटलं तरी पेच कायम अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे. अग्रलेखातून मराठा आंदोलनाबाबत सरकारला १० विचारण्यात आली आहेत.

मराठा आरक्षणाचा पेच हा महाराष्ट्राच्या गळ्याला लागलेला फास आहे. एरवी महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप करणारे भाजपचे दिल्लीश्वर आता पळ काढीत आहेत. 2 जानेवारीनंतर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही जरांगे-पाटलांची मागणी आता मान्य झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे यांनी सर्वपक्षीय विनंतीनंतर उपोषण मागे घेतलं, हे चांगलंचं केलं. मात्र एकीकडे मराठा आरक्षणावरुन राज्य पेटलं असताना राज्य वाऱ्यावर टाकून गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दिल्लीत गेले. राज्यातील अराजकापेक्षा फडणवीस यांना निवडणूक समितीची बैठक महत्त्वाची वाटते, हे दुःखद आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

सरकारने शब्द पाळला नाही तर मुंबईचे नाक बंद करू, असा इशारा जरांगेंनी दिला. मुंबईचे नाक बंद करणे हे ठीक आहे. पण मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी आता दिल्लीला धडक दिली पाहिजे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची चावी पंतप्रधान मोदींच्या खिशात आहे व मोदी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत, असंही सामनातून म्हटलं आहे. (Latest News)

सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आलेले प्रश्न

1) शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मिंधे सरकार नेहमीच म्हणत आले की, आमच्या मागे महाशक्ती आहे. ही महाशक्ती महाराष्ट्र पेटला असताना झोपली होती काय?

2) देवेंद्र फडणवीस निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दिल्लीस गेले. तेथे नरेंद्र मोदी व अमित शहा होते. फडणवीस यांनी जरांगे-पाटलांचे उपोषण व महाराष्ट्राच्या स्थितीवर पंतप्रधानांशी चर्चा केली काय?

3) भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या सामाजिक समरसतेला चूड लावायची आहे काय? मराठा समाज विरुद्ध 'ओबीसी' असा झगडा त्यांना पेटवायचा आहे काय?

4) सर्वपक्षीय बैठकीनंतर फडणवीस म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा. सगळे ठीक होईल.'' याचा अर्थ काय? मराठा आरक्षणापासून फडणवीस स्वतःला लांब का ठेवत आहेत?

5) मनोज जरांगे-पाटील हा फाटका फकीर माणूस असून त्याच्या रक्तात स्वार्थ नाही. त्यामुळे दबाव व खोक्यांनी तो विकत घेता येणार नाही. हीच सरकारची समस्या आहे काय?

6) मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ांवर लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावून घटनादुरुस्ती करणे गरजेचे आहे. विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अद्यापि का केली नाही? व आता तरी ते विशेष अधिवेशन घेतील काय?

7) मनोज जरांगे-पाटील यांना दिल्लीत नेऊन पंतप्रधानांशी चर्चा का घडवली गेली नाही?

8) गुजरातमधील 'पटेल' आंदोलनाप्रमाणे महाराष्ट्रातील 'मराठा' आंदोलन चिरडून टाकायची योजना आहे काय?

9) शेतकऱयांचे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर वर्षभर लांबवले, तसे मराठय़ांचे आंदोलन सरकारला लांबवत ठेवायचे राजकारण आहे काय?

10) सरकारला जरांगे-पाटलांचे नेतृत्त्व संपवून त्यांचा अण्णा हजारे करायचा आहे काय?

या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राला हवी आहेत. थातूरमातूर बैठका व चर्चा यातून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागणार नाही, असं 'सामना'त म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT