Sharad Pawar  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का, बडा नेता साथ सोडण्याच्या तयारीत; 'धनुष्यबाण' घेणार हाती

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पुण्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. अतुल देशमुख पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहे. ते लवकरच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत.

Priya More

Summary -

  • शरद पवारांना पुण्यातील राजकारणात मोठा धक्का बसणार

  • उत्तर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल देशमुख पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत

  • अतुल देशमुख हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार

  • विधानसभेच्या उमेदवारीवरून नाराजी आणि पक्षांतर्गत कलह या कारणामुळे ते पक्षाची साथ सोडणार

रोहिदास गाडगे, पुणे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील नेते अतुल देशमुख हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेणार आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये शिंदे गटाची ताकद वाढणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची साथ सोडून तुतारी फुकणारा नेता आता धनुष्य बाण हाती घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला उत्तर पुणे जिल्ह्यात बळ देणारं नेतृत्व मिळणार आहे. अतुल देशमुख उत्तर पुणे जिल्ह्यातील तरुणांमधले लोकप्रिय नेतृत्व मानलं जातात.खासदार अमोल कोल्हेंच्या विजयात अतुल देशमुखांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले जाते.

ऐनवेळी विधानसभेला उमेदवारी नाकारल्याने नाराजी अन् स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत दुफळी असल्याने अतुल देशमुख हे शरद पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती सांगितले जात आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील नवे राजकीय समीकरण घडवणारी ही मोठी राजकीय हालचाल ठरणार आहे.

दरम्यान, यापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जिल्ह्यात मोठे धक्के बसले होते. बुलडाणा, हिंगोली आणि अहमदनगरच्या जिल्हाध्यक्षांनी तडकाफडकी राजीनामा दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही हे नेते शरद पवार यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते. पण आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, बुलडाण्याच्या जिल्हाध्यक्षा रेखे खेडेकर आणि अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके या तिघांनी शरद पवार गटाला जय महाराष्ट्र केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchgrahi Yog: जानेवारीमध्ये शनीच्या राशीत बनणार पॉवरफुल पंचग्रही राजयोग; नव्या वर्षात 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹४५०० येणार; तीन महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता

राज्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना, आठवीतील मुलीवर सामूहिक बलात्कार, विवस्त्र सोडून दोघे पळाले

पुन्हा संतोष देशमुखांसारखी हत्या, संभाजीनगरात माजी सरपंचाचा खून, ११ जणांनी लोखंडी रॉड अन् लाठ्या-काठ्यांनी मारले

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत बिबट्याची दहशत ,एका रात्रीत चार गुरांना केलं ठार

SCROLL FOR NEXT