Ambernath News Saam Tv
मुंबई/पुणे

रासायनिक टँकर्सचा 'रात्रीस खेळ' होणार बंद! एमआयडीसी परिसरात नो एंट्री

संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत प्रवेश नाही; ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेचे आदेश

अजय दुधाणे

अंबरनाथसह डोंबिवली आणि बदलापूर एमआयडीसीत यापुढे रासायनिक टँकर्सना नो एंट्री असणार आहे. संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत ही प्रवेशबंदी असणार आहे. ठाणे पोलिसांच्या (Thane Police) विशेष शाखेनं याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळं या टँकर्सचा रात्रीस खेळ थांबणार आहे. एकीकडे नद्यांची स्वच्छता केली जात असतानाच नद्यांमध्ये, नाल्यांमध्ये रात्रीच्या वेळी रासायनिक सांडपाणी सोडण्याचे प्रकार मागील काही दिवसात आढळून आले आहेत.

हे देखील पाहा -

त्यामुळं यापुढे एमआयडीसी विभागात संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत रासायनिक टँकर्सना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळं या टँकर्सच्या माध्यमातून रात्रीच्या अंधारात केल्या जाणाऱ्या कृष्णकृत्यांना चाप लागणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने असून बहुतांशी कारखाने हे त्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता नदी किंवा नाल्यात सोडतात. तर काही कारखाने हे सांडपाणी टँकरमध्ये भरून दूरच्या एखाद्या नाल्यात सोडण्यास सांगतात. त्यातच अंबरनाथ एमआयडीसीत सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुद्धा बंद असल्यानं हे प्रकार मागील काही दिवसात चांगलेच वाढले होते. त्यामुळं आता पोलिसांच्या या आदेशानंतर जलस्रोतांमध्ये केलं जाणारं रासायनिक प्रदूषण थांबेल, अशी आशा आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ बनवले; मुलाला फाशी द्या! संतापलेल्या बापाची मागणी|VIDEO

Weather Update: राज्यावर दुहेरी संकट; कडक उन्हाळ्यात अवकाळीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस पावसाची शक्यता

Maharashtra News Live Update: वर्ध्यात सूर्य आग ओकतोय, आजही तापमान 46 अंशच्या वर

पुण्यात आठवड्यात २ हत्या; एकीकडे चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून, दुसरीकडे पुतण्याने काकाला संपवलं

Maratha Fort History: किल्ल्यावरील माची आणि बालेकिल्ला यांच्यातील नेमका फरक काय?

SCROLL FOR NEXT