Saam Tv
आषाढ अमावस्येला दिप अमावस्या म्हणतात. यंदाची दिप अमावस्या बुधवारी १२ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.
गव्हाच्या कणकेचे दिवे लावण्याची परंपरा आहे. गव्हाचे पीठ हे अन्नपूर्णा देवीचे स्वरूप मानले जाते. यामुळे घरात सुख,शांती आणि अन्नाची समृद्धी राहते.
यादिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते. पितरांचे स्मरण करून सूक्ष्म जीवांना पीठ खाण्यासाठी ठेवले जाते.
लहान मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, दीर्घायूष्य मिळावे म्हणून कणकेच्या दिव्यांनी मुलांचे औक्षण केले जाते.
गव्हाच्या पीठात गुळ, तूप, वेलची पूड टाकून कणकेचा दिवा बनवला जातो. दिव्याचा आकार देऊन पीठ उकडवले जाते. त्यात साजूक तूप घालून दिवे प्रज्वलित केले जातात.
दिवे प्रज्वलित करताना घरात सुख समृद्धी नांदो, उत्तम आरोग्य लाभो , पितरांचे आशीर्वाद कायम राहो, अन्नाची कमतरता भासू नये अशी प्रार्थना केली जाते.
शेवटी प्रसाद म्हणून हे दिवे खाण्यांची परंपरा आहे. तसेच घरातील सूक्ष्मजीवांपासून ते गाई- गुरांना, पक्षी- प्राण्यांना हा दिवा प्रसाद म्हणून खाण्यास दिला जातो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.