Jayant Patil Saam tv
मुंबई/पुणे

Jayant Patil On ED Enquiry: ईडीकडून जयंत पाटील यांची साडेनऊ तास चौकशी; कार्यालयातून बाहेर पडताच दिली पहिली प्रतिक्रिया

ईडीकडून चौकशी झाल्यानंतर कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

Vishal Gangurde

Jayant Patil: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडीने समन्स पाठवल्यानंतर आज मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. आज ईडीकडून जयंत पाटील यांची साडे नऊ तास चौकशी झाली. ईडीकडून चौकशी झाल्यानंतर कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले. (Latest Marathi News)

ईडीकडून कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटील म्हणाले, 'आज तुम्ही दिवसभर थांबला. महाराष्ट्रातील गावातून येथे येऊन दिवसभर समर्थन दिलं. माझ्यावर प्रेम व्यक्त केलं. पक्षाला समर्थन दिलं. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी आभारी आहे'.

'ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिले आहेत. ईडीकडे आता कोणतेही प्रश्न शिल्लक नसतील. नागरिक म्हणून मी कर्तव्य पूर्ण केलं आहे. दिवसभरात मी अर्ध पुस्तक वाचून काढलं आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, जयंत पाटील कार्यलयाच्या बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव नव्हता. जयंत पाटील हे हसतमुख चेहऱ्याने बाहेर येत कार्यकर्त्यांचे आभार मानले.

काय आहे प्रकरण?

जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून आर्थिक मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप जयंत पाटील यांच्यावर करण्यात आला होता. आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navpancham Rajyog: उद्यापासून चमकणार 'या' राशींचं नशीब; बुध-यम यांच्यामुळे नवपंचम राजयोग तयार होऊन मिळणार पैसा

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

SCROLL FOR NEXT