jayant patil  saam tv
मुंबई/पुणे

मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटील यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, जनता...

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने मंत्र्यांचे काही अधिकार सचिवांना देण्यात आले आहेत. तसेच शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) यांनी जोरदार टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Jayant Patil News : राज्यात शिंदे सरकार सत्तेवर येऊन १ महिना लोटला आहे. तरीही राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झाला नाही. त्यामुळे राज्याचा कारभार केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे चालवत आहेत. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने मंत्र्यांचे काही अधिकार सचिवांना देण्यात आले आहेत. तसेच शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) यांनी जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुणे पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आगामी महापालिका निवडणुका, बदललेली प्रभाग रचना आणि राजकीय विषयावर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सदर चर्चा झाल्यानंतर जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. जयंत पाटील म्हणाले, ' आज राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन ३६ पेक्षा अधिक दिवस झाले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावर काय प्रतिक्रिया द्यायची, जनता बघत आहे'.

'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सातशे ते साडे सातशे निर्णय घेतले आहेत. तर निवडणुकीला घाबरून जाऊन प्रभाग रचना बदलल्या आहेत. भाजप आणि शिंदे गट यांनी एकत्र येऊन जे निर्णय घेतले आहे, त्याला लोकांचे समर्थन आहे की नाही यासाठी निवडणूका घ्याव्यात', असे ते म्हणाले. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याच्या निर्णयावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, 'मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिले गेल्याचे असं मी कधी ऐकलं नाही. शिंदे सरकारची मंत्री नेमण्याची क्षमता नाही आहे, कायदा धाब्यावर बसवून सरकार चालवत आहेत'.

'एकनाथ शिंदे यांनी एवढी लांब उडी मारली आहे. कुणाची विचारधारा केव्हा बदलते सांगता येत नाही. एकनाथ शिंदे हे माझ्या शेजारी बसायचे, त्यांना कधी वाटलं नाही ते मुख्यमंत्री होईल. त्यांचा स्वभाव चांगला आहे. मात्र, त्यांनी जे केलं, ते योग्य केलं नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यावर सर्वच्या सर्व ४० आमदार हे उद्धव ठाकरे यांना भेटतील, त्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही', असेही पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

SCROLL FOR NEXT