Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar: काहींची भाषणे खूपच लांबली; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

कालच्या मेळाव्यात काहींना जेवायला मिळाले नाही, कुणाला नाष्टा, चहा मिळाला नाही; अजित पवारांचा आरोप

मंगेश कचरे

बारामती - काल, ५ ऑक्टोबरला शिवसेनेच्या (Shivsena) राजकीय इतिहासात पहिल्यांदात दोन दसरा मेळावे झाले. एक म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा तर दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. मुंबईत झालेल्या या दोन्ही मेळाव्यांमधून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर आणि भाजपवर सडकून टीका केली होती. यावर आता अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar Latest News)

यावेळी अजित पवार म्हणाले की, मी काल टिव्हीवर दोघांचेही मेळावे पहिले. दोन्ही मेळावे महाष्ट्राने पाहिले आहेत. दोघांनीही एकमेकांवर जोरदार टीका केली, मी दोघांच्याही भाषणावर टीका करणार नाही पण आता लोकांनी कुणाच्या पाठीमागे उभे राहायचे हे जनतेने ठरवावे. बारामती दौऱ्यावर असताना ते बोलत होते.

"कालच्या मेळाव्यात काहींना जेवायला मिळाले नाही, कुणाला नाष्टा, चहा मिळाला नाही. काहींना तर अनेक कार्यकर्त्यांना कशाला आणलं हेच माहिती नव्हतं असा गंभीर आरोप अजित पवार यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे जनतेने आता कुणाच्या पाठीशी उभे रहावे हे त्यांनी ठरवावे, कारण झेंडा शिवसेनेचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा असं मी कधी ऐकलं नाही. तर काल केलेली वक्तव्य हे राजकीय असल्यामुळे त्याला जास्त महत्त्व द्यायचं नसतं" असं देखील अजित पवार म्हणाले. (Latest Marathi News)

शिवसेनेची स्थापना झाल्यापासून दसरा मेळाव्याच बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी लोकं यायचे. पण कालच्या दसरा मेळाव्यात काहींची भाषणे खूपच लांबली, आता कुणाची लांबली ते तुम्हाला देखील माहिती आहे अशी मिश्किल टीकाही अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादीच्या अजिंठ्यावर चालते यात काही तथ्य नाही

ठाकरेंची शिवसेना ही राष्ट्रवादीच्या अजिंठावर चालते असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोप केला होता त्यावर अजित पवार म्हणाले, या आरोपात काही अर्थ नाही मंत्रिमंडळात काम करीत असताना ते माझ्या उजव्या बाजूला बसायचे याच्यात मी कधी ऐकले नाही की झेंडा शिवसेनेचा आहे अजिंठा राष्ट्रवादीचा आहे. कारण तिथे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस होती आम्हाला अनेक वर्ष वेगवेगळे पक्षाला घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे. 2004 व 2009 ला देखील आघाडी होती. काल जे काही वक्तव्य त्यांनी केले ते राजकीय हेतूने होते असे त्यांनी स्पष्ट केले.

काहींची भाषणे तर फारच लांबली

अजित पवार मुंबईला दसरा मेळाव्याला दोन्हीही गटाचे दसरा मेळावे झाले यात मुख्यमंत्री यांच्या गटाने दहा कोटी रुपये भरून बसेस नेल्या होत्या, त्यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांचे हाल झाले अशा गोष्टी करता कामा नयेत. तुम्हाला दसरा मेळावा महत्त्वाचा होता पण जनतेचा देखील विचार करणे गरजेचे होते आणि या मेळाव्यात काही काहींची भाषणे तर फारच लांबली ती कुणाची लांबी हे तुम्हाला माहिती आहे. राष्ट्रवादी वरती शिंदे गटाचा रोष होता असे विचारलं तर त्यांनी आमच्यावर नव्हता असे म्हणत निघून जाणे पसंत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tanya Mittal Amaal Mallik: अमल मलिक आणि तान्या मित्तलच्या नात्याला सुरुवात; बिग बॉसमध्ये खुलणार नवी प्रेमकथा

Gadchiroli : ब्रिटिश काळापासूनची समस्या आजही कायम; नदीवर पूल नसल्याने करावा लागतोय जीवघेणा प्रवास

पितृपक्षात सोनं महागलं की स्वस्त झालं? वाचा २४ कॅरेट १० तोळं सोन्याचा दर

kumbha Rashi : हितशत्रूंशी सामना, पण धनलाभाचेही योग! कसा असेल कुंभ राशीचा शुक्रवार?

Maratha Reservation : १० टक्के आरक्षण नको का? भुजबळांचा मराठा समाजाला सवाल

SCROLL FOR NEXT