BDD Chawl News Saam TV
मुंबई/पुणे

बिडीडी चाळींचे नामकरण; बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधीसह शरद पवारांचंही नाव

मुंबईतील बीडीडी चाळींची नावं आता बदलण्यात आली असून या चाळींच्या नामकरणाचा आदेश राज्य सरकारच्या गृहनिर्मान विभागाकडून काढण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळींची (BDD Chawl) नावं आता बदलण्यात आली असून या चाळींच्या नामकरणाचा आदेश राज्य सरकारच्या गृहनिर्मान विभागाकडून काढण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता वरळीतील बीडीडी चाळ ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर या नावाने ओळखली जाणार आहे. तसचं नायगावची चाळ शरद पवार नगर तर ना. म. जोशी चाळ ही आता राजीव गांधी नगर या नावाने ओळखली जाणार आहे.

वरळी (worli) येथील या चाळी जवळपास ९६ वर्षांपेक्षा जास्त जुन्या झाल्या असल्याने, त्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय शासनाने मंत्रिमंडळाच्या मान्यतेने घेतलेला होता. तसंच या चाळींचे नामकरण करण्याची बाब देखील शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे या चाळींच्या नामकरनाचा निर्णय घेतला आहे. आज त्याबाबतचा शासन निर्णय आज (शुक्रवारी) जारी करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

या चाळींचा पुनर्विकास होत असल्याने चाळींच्या नामकरण करण्याची घोषणा गृहनिर्मान मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सन २०२२ च्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती त्यानुसार आता या चाळींच नामकरण केल्याचा शासन निर्णय जारी झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Accident : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी १८ दिवसापूर्वी पुण्यातून निघाले, पण गुजरातमध्ये काळाने घात केला; ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT