mumbai news  Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईच्या हवेचा 'कॅन्सर' रिपोर्ट; प्रदूषणामुळे मुंबईकरांना फुफ्फुसाचा कॅन्सर, VIDEO

विषारी हवेमुळे मुंबईकर कॅन्सरच्या विळख्यात सापडलेत..त्याची कबुलीच आरोग्य मंत्र्यांनी दिलीय... मुंबईत कर्करोगांच्या रुग्णात किती टक्के वाढ झालीय... आणि मुंबईच्या हवेचा 'कॅन्सर' रिपोर्ट किती आहे? पाहूयात यावरचा खास रिपोर्ट...

Saam Tv

मुंबईकरांनो तुम्ही नाकावाटे घेत असलेला श्वास तुमच्या मृत्यूचं कारण ठरू शकतो...होय तुम्ही ऐकताय ते अगदी खरयं...मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललाय...अशातच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खुद्द आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांनीच देशाच्या आर्थिक राजधानीत 57 टक्के रुग्णांना फुफ्फुसाचा कॅन्सर हा प्रदूषणामुळे होतोय, अशी धक्कादायक माहिती दिलीय.

दरम्यान मुंबईतील वायू प्रदूषणाचा डेथ रिपोर्ट काय आहे? पाहूयात....

मुंबईत फुफ्फुसांच्या कॅन्सर रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ

महाराष्ट्रात फुफ्फुसाच्या कॅन्सरचे 1 हजार 677 रुग्ण

मुंबईत 57 टक्के रुग्णांना प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर

प्रदूषणाने गाठलेल्या उच्चांकांमुळे मुंबईकरांमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचं निदान वाढलयं...

मुंबई आता प्रदूषणाचं 'गॅस चेंबर' बनत चाललीय..

कॅन्सरशी लढण्यासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या धर्तीवर सुमारे 100 नवीन विशेष रुग्णालये स्थापन करण्याची गरज असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी अधोरेखित केल असलं तरी या आजाराला कारणीभूत ठरणार वायू प्रदूषण वेळीच रोखलं नाही तर उपचारांसाठी कितीही रुग्णालये बांधली तरी ती कमीच पडतील...आणि श्वास घेणंही महागात पडेल..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT