Mumbai Water Supply Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Water Supply: धरणांनी तळ गाठला...मान्सून यायला २० दिवस बाकी; BMC कडून अद्याप पाणीकपातीबाबत निर्णय नाही

Priya More

मे महिना संपत आला. वाढत्या तामनामुळे हैराण झालेले मुंबईकर आता मान्सूनची (Monsoon 2024) आतुरतेने वाट पाहत आहेत. पण नैऋत्य मान्सून मुंबईमध्ये येण्यासाठी अजून २० दिवसांपेक्षा जास्त कालावधी बाकी आहे. अशामध्ये मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कारण मुंबई शहराला पाणीपुरवठा (Mumbai Water Issue) करणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. धरणातील पाणीसाठ्यामध्ये दिवसेंदिवस होणारी घट लक्षात घेता मुंबईवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. पण अद्याप मुंबई महानगर पालिकेकडून पाणीकपातीबाबत कोणतीही योजना आखण्यात आलेली नाही.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे. तानसा, मोडक सागर, तुलसी, विहार, तानसा, भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा धरणातून मुंबई शहराला पाणी पुरवठा होतो. या सातही धरणांमधील पाणीपातळीत १०.२८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. या धरणांमधील पाणीपातळी ही गेल्या ३ वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेली आहे. त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे.

बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईमध्ये पाणीकपातीबाबत कोणतीही त्वरित योजना नाही. ते या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मुंबईमध्ये मान्सून सुरू होण्याची तारीख ११ जून आहे. त्यामुळे मान्सून यायला २० पेक्षा अधिक दिवस शिल्लक आहे. पण मान्सूनला आणखी विलंब लागला तर ३ वर्षांतील नीचांकी पातळीसह पाणीकपात लागू करण्यास मुंबई महानगर पालिकेला भाग पाडले जाऊ शकते.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील एकूण पाणीसाठी हा १.४८ लाख दशलक्ष लिटर म्हणजेच आवश्यक पातळीच्या १०.२९ टक्के इतका आहे. मागच्या वर्षी म्हणजे २०२३ ला याच दिवशी या धरणांमधील पाणीसाठा २.३१ लाख दशलक्ष लिटर म्हणजेच १६ टक्के इतका होता. तर २०२२ मध्ये या धरणांमधील पाणीसाठा २.९८ लाख दशलक्ष लिटर म्हणजेच २०.६३ टक्के इतका होता.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहराची तीन दिवसांची पाण्याची गरज भागवण्यासाठी १ टक्के पाणीसाठा जवळपास पुरेसा आहे. यावर्षी सात धरणांमधील पाणीसाठी सुरूवातीपासूनच मागील वर्षाच्या तुलनेत कमी असल्याने फेब्रुवारीमध्ये राज्य पाटबंधारे विभागाने भातसा आणि अप्पर वैतरणा येथील अतिरिक्त राखीव पाणीसाठ्यासाठी बीएमसीची विनंती मान्य केली होती.

बीएमसी दररोज मुंबईसाठी ३,८०० दशलक्ष लिटर पाण्याची व्यवस्था करते. मुंबईला भातसा धरणातून ४८ टक्के, अप्पर वैतरणा धरणातून १६ टक्के, मध्य वैतरणा धरणातून १२ टक्के, मोडक सागर धरणातून ११ टक्के आणि तानसा धरणातून १० टक्के पाणी पुरवठा केला जातो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आतमध्ये असलेल्या तुळशी आणि विहार तलावातून मुंबईला एकूण २ टक्के पाणीपुरवठा केला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT