Mumbai Water Supply Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Water Supply: धरणांनी तळ गाठला...मान्सून यायला २० दिवस बाकी; BMC कडून अद्याप पाणीकपातीबाबत निर्णय नाही

BMC Not Planning Water Cut: धरणातील पाणीसाठ्यामध्ये दिवसेंदिवस होणारी घट लक्षात घेता मुंबईवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. पण अद्याप मुंबई महानगर पालिकेकडून पाणीकपातीबाबत कोणतीही योजना आखण्यात आलेली नाही.

Priya More

मे महिना संपत आला. वाढत्या तामनामुळे हैराण झालेले मुंबईकर आता मान्सूनची (Monsoon 2024) आतुरतेने वाट पाहत आहेत. पण नैऋत्य मान्सून मुंबईमध्ये येण्यासाठी अजून २० दिवसांपेक्षा जास्त कालावधी बाकी आहे. अशामध्ये मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कारण मुंबई शहराला पाणीपुरवठा (Mumbai Water Issue) करणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. धरणातील पाणीसाठ्यामध्ये दिवसेंदिवस होणारी घट लक्षात घेता मुंबईवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. पण अद्याप मुंबई महानगर पालिकेकडून पाणीकपातीबाबत कोणतीही योजना आखण्यात आलेली नाही.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे. तानसा, मोडक सागर, तुलसी, विहार, तानसा, भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा धरणातून मुंबई शहराला पाणी पुरवठा होतो. या सातही धरणांमधील पाणीपातळीत १०.२८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. या धरणांमधील पाणीपातळी ही गेल्या ३ वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेली आहे. त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे.

बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईमध्ये पाणीकपातीबाबत कोणतीही त्वरित योजना नाही. ते या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मुंबईमध्ये मान्सून सुरू होण्याची तारीख ११ जून आहे. त्यामुळे मान्सून यायला २० पेक्षा अधिक दिवस शिल्लक आहे. पण मान्सूनला आणखी विलंब लागला तर ३ वर्षांतील नीचांकी पातळीसह पाणीकपात लागू करण्यास मुंबई महानगर पालिकेला भाग पाडले जाऊ शकते.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील एकूण पाणीसाठी हा १.४८ लाख दशलक्ष लिटर म्हणजेच आवश्यक पातळीच्या १०.२९ टक्के इतका आहे. मागच्या वर्षी म्हणजे २०२३ ला याच दिवशी या धरणांमधील पाणीसाठा २.३१ लाख दशलक्ष लिटर म्हणजेच १६ टक्के इतका होता. तर २०२२ मध्ये या धरणांमधील पाणीसाठा २.९८ लाख दशलक्ष लिटर म्हणजेच २०.६३ टक्के इतका होता.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहराची तीन दिवसांची पाण्याची गरज भागवण्यासाठी १ टक्के पाणीसाठा जवळपास पुरेसा आहे. यावर्षी सात धरणांमधील पाणीसाठी सुरूवातीपासूनच मागील वर्षाच्या तुलनेत कमी असल्याने फेब्रुवारीमध्ये राज्य पाटबंधारे विभागाने भातसा आणि अप्पर वैतरणा येथील अतिरिक्त राखीव पाणीसाठ्यासाठी बीएमसीची विनंती मान्य केली होती.

बीएमसी दररोज मुंबईसाठी ३,८०० दशलक्ष लिटर पाण्याची व्यवस्था करते. मुंबईला भातसा धरणातून ४८ टक्के, अप्पर वैतरणा धरणातून १६ टक्के, मध्य वैतरणा धरणातून १२ टक्के, मोडक सागर धरणातून ११ टक्के आणि तानसा धरणातून १० टक्के पाणी पुरवठा केला जातो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आतमध्ये असलेल्या तुळशी आणि विहार तलावातून मुंबईला एकूण २ टक्के पाणीपुरवठा केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालवण येथे बेपत्ता मच्छीमाराचा मृतदेह 18 तासानंतर सापडला

शहापूरमध्ये शाळकरी मुलींना विवस्त्र करून मारहाण; पालकांचा एकच संताप, नेमकं काय घडलं? VIDEO

Cooking Tips : जेवणात जास्त गरम मसाला गेल्यास काय करावे?

बेळगावात मराठी कुटुंबानं उचललं टोकाचं पाऊल; विष प्राशन करून तिघांनी आयुष्य संपवलं, एकीची प्रकृती गंभीर | Belgaum

Ambernath : लिफ्टमध्ये एकटा दिसला, बिल्डिंगमधील व्यक्तीचा 12 वर्षीय मुलावर हल्ला; हातालाही चावला, अंबरनाथमध्ये खळबळ VIDEO

SCROLL FOR NEXT