Mumbai Dam Water Level Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलाशये ९० टक्के भरली, वाचा सातही धरणातील पाणीसाठ्याची आकडेवारी

Mumbai Rain And Dam Water Level Update: धरणक्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिला तर येत्या काही दिवसांत जलाशयांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊन १०० टक्क्यांवर पोहचेल.

Priya More

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. या सात जलाशयांपैकी ५ जलाशय काठोकाठ भरली आहेत. सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९०.८७ टक्क्यांवर पोहचला आहे. धरणक्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिला तर येत्या काही दिवसांत जलाशयांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊन १०० टक्क्यांवर पोहचेल. मध्य वैतरणा धरण ४ जुलै रोजी ओव्हर फ्लो झाले. ७ जलाशयांपैकी ५ जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. या धरणांमध्ये आजच्या तारखेपर्यंत किती पाणीसाठा जमा झाला हे आपण जाणून घेणार आहोत...

मुंबई महानगर पालिकेने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १३,१५,१६५ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९०.८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ११,८२,८१५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच ८१.७२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्यावर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा ९ टक्क्यांनी वाढला आहे.

ठाण्यातील शहापूरमध्ये असलेले तानसा धरण २६ जुलै रोजी ओव्हर फ्लो झाले. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन तलावांपैकी एक तुलसी तलाव २० जुलै रोजी ओव्हर फ्लो झाले. मुंबई शहर आणि उपनगराला ७ जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलाव आहेत. यासातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे.

अशामध्ये पुढच्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामधील तुलसी, विहार, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा ही जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ८२.३२ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.

- तानसा - ९९.१८ टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ९५.९२ टक्के पाणीसाठा

- भातसा - ८८.४३ टक्के पाणीसाठा.

- विहार - १०० टक्के पाणीसाठा.

- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT