Mumbai Dam Water Level Status Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level: मुंबईवरील पाणीसंकट दूर होणार, ७ धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा आजची आकडेवारी

Mumbai Water Issue: मुंबईला पाणीपुरठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रामध्ये सध्या चांगला पाऊस पडत आहे. यामुळे धरणामधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Priya More

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईवरील पाणीसंकट दूर होण्याची शक्यता आहे. कारण मुसळधार पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सातही धरणक्षेत्रामध्ये सध्या चांगला पाऊस पडत आहे. यामुळे धरणामधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये सध्या असेलली १० टक्के पाणीकपात आता दूर होण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगर पालिकेने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ३५.११ टक्के इतका झाला आहे. १५ जुलै रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ५,०८,१०८ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ३५.११ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. काल सातही धरणात ३० टक्के पाणीसाठा होता. कालच्या तुलनेत आजच्या पाणीसाठ्यात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ५ धरण आणि २ तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो. यासातही धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दररोज ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.

गेल्या महिन्यामध्ये धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. आता धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईवर असलेले पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या मध्यावर आले असलो तरी देखील मुंबईसह राज्यात म्हणावा तसा पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे मुंबईसह प्रमुख शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा मागच्यावर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ५.६८ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - ५५.२३ टक्के पाणीसाठा.

- तानसा - ७०.७३ टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ३१.५५ टक्के पाणीसाठा

- भातसा - २८.७० टक्के पाणीसाठा.

- विहार - ५३.९९ टक्के पाणीसाठा.

- तुलसी - ७९.७० टक्के पाणीसाठा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

SCROLL FOR NEXT