file photo  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai | विलेपार्लेतील जखमी गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

गोविंदांसह सर्वसामांन्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायलं मिळालं. मात्र, सोमवारी दुर्देवाने उपाचारादरम्यान मुंबईत एका जखमी गोविंदाचा मृत्यू झाला आहे. या गोविंदाच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : मुंबई राज्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात शुक्रवारी दहीहंडीचा (Dahi Handi) सण साजरा करण्यात आला. यंदाच्या वर्षी सरकारकडून कोरोनाचे कोणतेही निर्बंध लादण्यात आले नव्हते. त्यामुळे गोविंदांसह सर्वसामांन्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायलं मिळालं. मात्र, सोमवारी दुर्देवाने उपाचारादरम्यान मुंबईत एका जखमी गोविंदाचा मृत्यू झाला आहे. या गोविंदाच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

विलेपार्ले पूर्व येथील शिवशंभो पथकातील गोविंदा संदेश दळवी हा दहीहंडीच्या दिनी थरावरून पडून जबर जखमी झाला. विलेपार्ले येथे विमानतळ जवळील हंडी फोडताना अपघात झाला होता. जखमी गोविंदावर वैद्यकीय उपाचार नानावटी रुग्णालयात सुरु होते. या जखमी गोविंदावर शुक्रवारपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्याचा आज, सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संदेशच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संदेश हा मुंबईच्या विलेपार्ले येथे राहायला होता. संदेशची परिस्थिती हलाखीची असून त्याची आई घरकाम करते. संदेशच्या मृत्यूनंतर विलेपार्ले परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, संदेशच्या मृत्यूनंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर म्हणाले, 'या गोविंदाच्या मृत्यूचं कोणीही राजकारण करू नये. शिंदे सरकार हे संवेदनशील आहे. शिंदे सरकार सर्व मदत देणार आहे'.

दरेकरांनी संदेशच्या मृत्यूनंतर सवाल करत शिवसेनेवर टीका केली आहे. 'गोविंदाच्या मृत्यूं भांडवल म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाताय ? असा सवाल करत दरेकरांनी निशाणा साधला. उद्धव ठाकरेंची शिवसेना हे चुकीचं करत आहे, असेही दरेकर म्हणाले.

मंत्री गिरीश महाजन यांनी देखील घटनेवर दुःख व्यक्त केलं. गिरीश महाजन म्हणाले, 'गोविंदा संदेश दळवीचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दोन दिवसांपासून त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला आज नानावटीत दाखल केलं. त्याच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत तर आहेच, पण त्याच्या कुटुंबीयांचे पुनर्वसनासाठी सरकार पूर्ण करणार आहे. कुटुंबीयांच्या आग्रहामुळे त्यांनी त्याला नानावटीत नेलं. आवश्यकता असेल तर या पूर्ण घटनेची चौकशी केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी मंडळासोबत आज चर्चा केली. नियमावली पालन झालं की नाही याची चौकशी करणार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT