Mumbai Fire Department will be more updated... Saam TV
मुंबई/पुणे

Fire Brigade: मुंबई अग्निशमन विभाग होणार आणखी अद्ययावत...

Fire Brigade Mumbai: फायर बाईक्स घेतल्या जाणार आहेत. एखाद्या उंच ठिकाणी पोहचण्यासाठी लागणाऱ्या उंच शिड्या देखील घेतल्या जाणार आहेत.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबई महापालिकेचं अग्निशमन विभाग आणखी अद्यावत होणार आहे. मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात अग्निशमन विभागाचे अग्निशमन केंद्र आहेत. पण आता अग्निशमन विभागाकडून (Fire Brigade) मुंबईतल्या (Mumbai) वेगवेगळ्या ठिकाणी ४० छोटे अग्निशमन केंद्र उभारली जाणार आहेत. सुरुवातीच्या काळात ५ केंद्र सध्या उभारली जात आहेत. या केंद्रांमुळे अग्निशमन विभागाला आपली क्षमता वाढवून दुर्घटना घडल्यास तात्काळ उपाययोजना करणं सोप्पं होणार आहे. 'प्रोग्राम ऑन एनहान्समेंट ऑफ इमर्जन्सी रिस्पॉन्स' उपक्रमांतर्गत ही केंद्र उभारली जाणार आहेत. (Mumbai Fire Department will be more updated...)

हे देखील पहा -

या छोट्या अग्निशमन केंद्राच्या उभारणी बरोबरच पूर्व आणि पश्चिम उपनगरात रोबोट घेतले जाणार असून, त्यांचाही वापर केला जाणार आहे. त्याचप्रमाणे फायर बाईक्स घेतल्या जाणार आहेत. एखाद्या उंच ठिकाणी पोहचण्यासाठी लागणाऱ्या उंच शिड्या देखील घेतल्या जाणार आहेत. यामुळे मुंबईत विविध ठिकाणी आगीच्या घटनेनंतर आग लवकर विझवण्यासाठी अग्निशमन दलाला वेळेत पोहोचता येणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : साताऱ्यातील परळीच्या अंजना कुंभार यांना स्वातंत्र्य दिनासाठी राष्ट्रपतींचे विशेष निमंत्रण

Shilpa Shetty Dance : 'तुने दिल पे चलायी छुरीया' गाण्यावर शिल्पा शेट्टीचा जबरदस्त डान्स, पन्नाशीतही कमालीची एनर्जी; नेटकऱ्यांकडून कौतुक

Car Safety : कारमध्ये एसी लावून झोपताय? तर तुमचाही होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या कारण

Wife Kills Husband : नवऱ्याला तडफडून मारलं, १६ वर्षाच्या मुलीच्या प्रियकराला सुपारी, पत्नीचा राक्षसी चेहरा

Water Crisis : भर पावसाळ्यात पाणी टंचाई, महिलांना करावी लागतेय भटकंती; ६ महिन्यापासून गावात समस्या

SCROLL FOR NEXT