
दोन गाड्यांची तोडफोड
पुण्यात मध्यवर्ती भागात भांडणातून दोन गाड्यांची तोडफोड
नारायण पेठेत भर गर्दीच्या ठिकाणी घडली घटना
हत्याराने वार करत एक जण जखमी
विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल
भारतातील किल्ल्यांना मानांकन मिळवून देणारे विशाल शर्मा यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. विशाल शर्मा यांना छत्रपती शिवाजी महाराज वारसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसेच ३ लाख रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात आलं.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस नदी नाल्यांना महापूर
नांदेडचे दहा पर्यटक अडकले, सुखरूप ठिकाणी पोहोचण्यासाठी पंचवीस किलोमीटरचा केला पाईप्रवास.
दहा पैकी 7 प्रवासी एका ठिकाणी तर 3 प्रवासी दुसऱ्या ठिकाणी
नांदेडच्या बिलोली येथील सचिन पत्तेवार यांनी केला शेअर केला व्हिडिओ.
सरकारने लवकरात लवकर मदत मदत देण्याची मागणी
खारघरमध्ये पुन्हा मराठी आणि हिंदी भाषा वाद उफाळला आहे.
परप्रांतीय दुकानदार आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला वाद.
परप्रांतीय दुकानदाराचा वर्गणी देण्यास नकार देत मराठी माणसामुळे आमचं दुकान चालत नाही म्हणत केली चिथावणी.
मराठी बोलणार नाही आणि शिकणार नाही, म्हणत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर केली मुजोरी.
मनसे कार्यकर्त्यांनी उतरवला परप्रांतीय दुकानदाराचा माज.
परप्रांतीय दुकानदाराने मागितली माफी.
लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांनी भर जनता दरबारात नागरिकाच्या प्रश्नावर मंडळ अधिकाऱ्याला चांगलं झापलं आहे. नागरिकांचे प्रश्न का सोडवत नाही,, काँग्रेसचा कार्यकर्ता आहे,,का नीट नोकरी करायची का नाही. गाठ माझ्याशी आहे अशा शब्दात मंडळ अधिकाऱ्याची चांगलीच आमदार कराड यांनी हजेरी घेतली आहे.
पुण्यातील पीएमपीएमएलच्या ताफ्यातील डिझेल बस शून्यवर आणणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवर चार चाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार चाकी उलटून पडली. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र अपघातामुळे जालना रोडवर वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर शहरातील वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या जालना रोडवर भीषण अपघात झाला.
भरधाव चार चाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चार चाकी थेट दुभाजकावर चढली. वाहनाचा वेग अधिक असल्याने चार चाकी ने पलटी मारली.सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
प्रदेश काँग्रेसचे पुण्यात दोन दिवस आत्मपरीक्षण शिबीर
११ आणि १२ ऑगस्ट रोजी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची पुण्यात महत्वाची बैठक
राज्यातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काँग्रेस पक्ष करणार मंथन
पक्षातील नेत्यांची गळती रोखण्यासाठी देखील काँग्रेस करणार आत्मचिंतन
बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढताना काँग्रेसला अधिक जागा मिळण्यासाठी कोणती रणनीती आखायची, महाविकास आघाडीसोबत जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असावा, कोणत्या जागांवर अधिक लक्ष केंद्रित करायचे, यावर चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीला प्रमुख नेत्यांकडून मार्गदर्शन आणि सूचना दिल्या जाणार आहेत.
या कार्यकारणीच्या बैठकीला परिषदेच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे राज्यातील सर्व बडे नेते राहणार उपस्थितीत..
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमच्याबरोबरच्या काहींचा पक्षप्रवेश तेथे घेण्यात आला..
27 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काही लोकांनी जाणीवपूर्वक हा पक्ष प्रवेश करून घेतला..
शिंदे सेनेचा जिथे मेळावा झाला तिथेच त्याच ठिकाणी मी उद्या मेळावा घेणार आहे..
उद्याच्या मेळाव्याला आधीच्या मेळाव्यापेक्षाही कितीतरी पटीने लोक जास्त जमतील..
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात लोकांच्या मनात काहीही संभ्रम राहिलेला नाही..
निवडणुका होतात की होत नाहीत हा संभ्रम कालपर्यंत होता..
उद्धव ठाकरेंनी पाच जुलैला सांगितले आम्ही एकत्र आले आहोत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात आणि अधिकाऱ्यांविरोधात कोपरखैरणे इथे माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे आणि स्थानिक नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केलेला आहे यामध्ये पालिकेकडून दूषित पाणीपुरवठा, गार्डनचे दुरावस्था ,,अनाधिकृतपणे बांधकाम अनाधिकृतपणे फेरीवाले अशा अनेक समस्यांसाठी कोपरखैरणे येथे साखळी उपोषणाला माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू आहे
धुळे शहरात सिंधी कॅम्प येथील सदाशिव फूड्स या पोंगे व कुरकुरे बनवण्याच्या कंपनीला अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे, यासंदर्भातील माहिती अग्निशमन विभागास दिल्यानंतर अग्निशमन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, व मोठ्या शर्तीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले आहे,
आयटी पार्क हिजवडी पाठोपाठ आता आयटी पार्क परिसरातील माण ग्रामपंचायत ने देखील उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या रस्ता रुंदीकरणाच्या धोरणाला कडाडून विरोध केला आहे
२७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला राज्यात सुरुवात होणारे पण तत्पूर्वी पुण्यात चर्चा रंगतेय ती म्हणजे सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीची. पुणे पोलिसांनी आज पोलिस आयुक्तालयात मानाचे गणपती मंडळलं आणि शहरातील इतर मंडळांसोबत बैठक केली. यावेळी शहरातील काही गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीबाबत त्यांच्या हरकती आणि सूचना पोलिसांकडे नोंदवल्या. दुसऱ्या बाजूला, मानाचे गणपती मंडळांनी सुद्धा पोलिस आयुक्त यांच्याशी चर्चा केली. सगळ्या मंडळांसोबत समन्वय ठेवून चर्चा करून निर्णय होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली
नाशिकच्या मालेगाव मध्ये ऐका चोरट्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाल्याची घटना घडली आहे,छावणी पोलिसांनी सकाळी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात नांदगाव येथील नवनाथ पवार या संशयिताला पकडून आणले,त्याने 10 ते 12 मोटरसायकल चोरल्याचा संशयावरून त्याला पडून छावणी पोलीस स्टेशन मध्ये बसवले होते मात्र पोलिसांना चकमा देत तो फरार झाला,पोलिसांनी सिनेस्टाईल त्याचा पाठलाग करत त्याला जेरबंद केले, पोलीस स्थानकातून चोरटा फरार झाल्याची चर्चा मात्र चांगलीच रंगली.
कोल्हापूरच्या मठातील महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी हिंगोलीत मूक मोर्चा काढण्यात आला आहे, हिंगोलीच्या सेनगाव शहरात शेकडोंच्या संख्येने महिला व पुरुष नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते महादेवी हत्तींनी सोबत भाविकांच्या भावना जोडल्या गेल्याचे सांगत या मोर्चेकरांनी राज्य सरकारला आर्त हाक दिली आहे दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्र्यासह पंतप्रधानांना देखील यावेळी लेखी स्वरूपात निवेदन पाठवण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर मोठी माहिती समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये व्हिव्हिपॅट नसणार, अशी माहिती. तसेच निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे.
वांगणीतील रेल्वे फाटक रस्त्याची पुरती दुरवस्था झालीय. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहनं चालवणही कठीण होऊन बसलय. मात्र या खड्डेमय रस्त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केलय.
मुंबईच्या सांताक्रुझ पश्चिम परिसरात मोठा अपघात. भरधाव वेगाने जात असलेली बाईक रस्ता क्रॉस करत असलेल्या व्यक्तीला जोरदार धडक दिल्यामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू. सांताक्रुज पश्चिम परिसरात एसएनडीटी कॉलेजच्या समोर गणेश लखन शाह 39 वर्ष हे पायी चालून रस्ता क्रॉस करत होते. त्याच दरम्यान भरधाव वेगाने समोरून येणारा बाईक चालकांनी जोरदार धडक दिल्यामुळे गंभीर जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या संपूर्ण घटना तिथे असलेला सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर म्हाडाकडून सोडत जुन-२०२५ अन्वये १३४१ निवासी सदनिका भुखंड व नाशिक मंडळातील ६७ सदनिका असे १४०८ सदनिका भुखंडाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्जदारांना 31 ऑगस्ट, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अनामत रकमेचा भरणा करून ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. प्राप्त होणाऱ्या अर्जांची 26 सप्टेंबर, 2025 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी दिली.
आदिवासी दिनानिमित्त धडगाव शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन....
धडगाव शहरात आयोजित रक्तदान शिबिरात रेकॉडब्रेक रक्तदान....
जिल्हाभरातील सर्वाधिक 360 रक्तदानी रक्तदान करत केला विक्रम....
9 ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने जिल्ह्यातील रक्ताचा तुटवला लक्षात घेत रक्तदान शिबिरात विक्रमी रक्तदान...
ऐन पावसाळ्यात लंपी आजाराने तोंड वर काढले आहे . पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात सध्या सर्वाधिक जनावरांशा लंपीचा प्रादुर्भाव झाला आहे. माळशिरस मध्ये 132 तर पंढरपुरात 68 जानवारांना लंपी आजाराची लागण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात 1 हजार 544 जनावरे लंपी आजारामुळे बाधित झाले आहेत. यामध्ये 1 हजार 108 जनावरे बरी झाली आहेत. तर 33 जनावरे दगावली आहेत. सध्या 403 जनावरांवर उपचार सुरू आहे. यामध्येच माळशिरस आणि पंढरपुरातील सर्वाधिक जनावरे लंपी आजाराने बाधित झाली आहेत. पशुसंवर्धन विभागाने उपाय योजना म्हणून लसीकरण मोहिम सुरू केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात आणि अधिकाऱ्यांविरोधात कोपरखैरणे इथे माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे आणि स्थानिक नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केलेला आहे यामध्ये पालिकेकडून दूषित पाणीपुरवठा, गार्डनचे दुरावस्था ,,अनाधिकृतपणे बांधकाम अनाधिकृतपणे फेरीवाले अशा अनेक समस्यांसाठी कोपरखैरणे येथे साखळी उपोषणाला माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू आहे
जो नेता २९ ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, त्याला आगामी नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पाडा अस आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते सध्या गावागावांमध्ये चावडी बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे,. याच अनुषंगाने आज धाराशिव शहरात बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत राजकीय नेत्यांना इशारा दिला आहे.
आम्हाला मान नको आता आमचा हट्ट पूर्ण करा. पुण्यातील गणेश मंडळं सकाळी सात वाजता मिरवणुकीला सुरुवात करण्यावर ठाम.
सातारा जिल्ह्यातील परळी येथील नवउद्योजिका सौ. अंजना शंकर कुंभार यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भवन आणि लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील त्या एकमेव महिला उद्योजिका आहेत ज्यांना हा सन्मान लाभला आहे.उमेद अभियानांतर्गत लखपती दीदी योजनेचा लाभ घेऊन त्यांनी मातीच्या मूर्ती, भांडी आणि खेळण्यांचा व्यवसाय राज्यभर विस्तारला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले.सातारा डाक विभागामार्फत त्यांच्या घरी जाऊन महिला पोस्ट कर्मचाऱ्यांच्या हस्ते निमंत्रण पत्रिका देण्यात आली. हा महिला सक्षमीकरणाचा आदर्श ठरला आहे.
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत सात ऑगस्ट रोजी बाबाजानी मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत देशपातळीवर काँग्रेस पक्ष हा भाजप विरोधात लढत असल्याने आपण काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बाबाजानी यांनी सांगितले आहे सर्व पदाधिकाऱ्यांसह आपण काँग्रेस प्रवेश करणार असून येत्या काळात काँग्रेस वाढविण्यावर भर देणार असल्याचे बाबाजी यांनी स्पष्ट केले आहे.. विधानसभा निवडणुकीत ही त्यांनी पाथरी विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवली होती त्यात ते पराभूत झाले होते
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख, बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक किशोर पाटील, नितीन ठाकूर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये पक्ष प्रवेश
बीजेपीच्या प्रदेश कार्यालयात सर्व नेत्यांचा झाला पक्षप्रवेश
वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित नालासोपारा विधानसभा आमदार राजन नाईक यांच्या उपस्थितीत बीजेपीच्या प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश
मनोज जरांगे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, जरांगे यांनी 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला, त्यासाठी जरांगे यांच्याकडून तगड नियोजन सुरू आहे. मुंबई येथील आंदोलनासाठी 1 हजार स्वयंसेवक, 1हजार डॉक्टर, तज्ञ वकील, आणि 5 हजार पाणी टँकर, अशा प्रकारचे नियोजन देखील यावेळी करण्यात आल्याची माहिती मनोज जरांगे यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे.
मुलुंड पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पादचारी पुलाचे (FOB) काम वर्षभरापासून रखडले आहे. पंतप्रधान गती शक्ती योजनेंतर्गत पालिका आणि रेल्वेचे संयुक्त प्रकल्प असूनही, मुंबई महानगरपालिकेकडून निधी न मिळाल्याने बांधकाम थांबले आहे. मे २०२४ ची डेडलाईनही चुकली असून, ५०% काम पूर्ण झाले आहे. स्थानिकांना रोजचा त्रास सहन करावा लागत आहे. जुन्या पुलाची अवस्था वाईट झाल्याने तो पाडण्यात आला होता. मात्र नवीन पूल अद्याप सुरू झालेला नाही. सामाजिक कार्यकर्ते ॲड. सागर देवरे यांनी लवकर काम सुरू न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.
मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरू होण्यापूर्वी इतर रस्त्यांवरून मार्गस्थ होण्यासाठी मंडळांना मिरवणुकीची परवानगी द्या, मंडळांचे पोलिसांना आवाहन
बेलबाग चौक ते नाना पेठ रस्ता गणेशोत्सव दरम्यान रस्ता सुरू करा, पोलिसांकडे मागणी
पुणे शहरातील सर्वच गणेश मंडळांची मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी गणेश मंडळं आग्रही
मानाची पाच गणपतींची मिरवणूक दुपारी १२ पर्यंत पूर्ण मार्गस्थ करावी, इतर मंडळांवरचा ताण कमी होणार, मंडळांची आग्रही भूमिका
पुण्यातील टिळक रोड वर गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी ८ पासून सुरू होणार
टिळक रोड वरून मार्गस्थ होणाऱ्या गणेश मंडळांचा निर्णय जवळपास निश्चित
- काही खरेदी केंद्रांवर कांदा खरेदीच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं समोर
- नियमापेक्षा कमी गुणवत्तेचा कांदा खरेदी केला जात असल्याचं उघड
- तर काही केंद्रांवर कांदा खरेदी आणि साठवलेल्या कांद्यात मोठ्या प्रमाणात तफावत
- नाफेड आणि NCCF च्या कांदा खरेदीत यंदा पुन्हा घोळ ?
- चांगल्या प्रतीचा कांदा दाखवून कमी गुणवत्तेच्या कांद्याची खरेदी केली जात असल्याचं उघड
- मागील वर्षी देखील नाफेड आणि NCCF च्या कांदा खरेदीत कोट्यवधी रुपयांचा गैरप्रकार आला होता समोर
- यंदा पुन्हा नाफेड आणि NCCF च्या कांदा खरेदीत गैरप्रकार
बैठकीला शहरातील प्रमुख गणेश मंडळांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत
या बैठकीनंतर पुण्यातील मानाच्या गणपतींच्या गणेश मंडळांची बैठक होणार
गणेश मंडळांच्या समस्या, सूचना या बैठकीत येणार चर्चेला
गणपती विसर्जन मिरवणुकीबाबत सुद्धा या बैठकीत चर्चा होणार
मानाच्या गणपती पुर्वी अनेक गणेश मंडळ सकाळी ७ वाजता मिरवणुकीत सहभागी होण्याची तयारीत
* मनसे नेते सुदाम कोंबडे यांनी दखल केली मानहानीची याचिका..
* नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात केली याचिका दाखल..
* 15 दिवसांपूर्वी दिली होती नोटीस..
* मराठी माणसाची माफी मागावी अन्यथा याचिका दाखल करण्याचा दिला होता इशारा..
* मात्र दुबे यांच्याकडून कोणताही माफीनामा न आल्याने अखेर आज याचिका दाखल
धाराशिव मध्ये मराठा समाजासोबत चलो मुंबईच्या अनुषंगाने चर्चा..
मोठ्या संख्येने मराठा बांधव बैठकीला उपस्थित..
आज दिवसभर धाराशिव येथे समाज बांधवांसोबत चर्चा. आणि आज धाराशिव मध्येच मुक्काम..
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे बीडच्या दौऱ्यावरती असून अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीडच्या वळवणीतील मुंडे पिता-पुत्र राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये प्रवेश करत आहेत राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होत आहे या प्रवेशाच्या बॅनर वरती माजी मंत्री आणि नेते धनंजय मुंडे यांचा फोटो गायब आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या समर्थक आणि पक्षाचे शहराध्यक्ष अमर नाईकवाडे यांच्या बॅनरवरून आमदार प्रकाश सोळंके यांचा फोटो गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे
नांदणी इथल्या महादेवीसाठी आज गडहिंग्लज तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा
मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी
गडहिंग्लज इथल्या दसरा चौक परिसरातून तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आला मोर्चा
सकाळी सात वाजता सार्वजनिक मिरवणूक काढण्यावर ठाम असलेल्या 100 गणेश मंडळाची सुरुवातीला बैठक घेणार
त्यानंतर शहरातील मानाचे नसलेले मात्र महत्त्वाचे गणेश मंडळ असलेले अखिल मंडई गणेश मंडळ भाऊ रंगारी गणेश मंडळ दगडूशेठ गणेश मंडळ यास नामांकित गणेश मंडळाची होणार बैठक
पुण्यातील मानाच्या पाच गणपतीच्या गणेश मंडळ कार्यकर्त्यासोबत पोलीस आयुक्त घेणार बैठक दिवसभर पोलीस आयुक्त कार्यालयात बैठकीचे सत्र सुरू असणार
- मंत्री झिरवाळांविरोधात अधिकाऱ्यांचं एक दिवसीय लेखणी बंद आंदोलन
- नंदुरबारच्या अधिकाऱ्याचं चुकीच्या पद्धतीने निलंबन केल्याचा आरोप करत केलं लेखणी बंद आंदोलन
- काल सोमवारी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिवस केलं लेखणी बंद आंदोलन
- कोकाटेंपाठोपाठ नाशिकच्या दुसऱ्या मंत्र्यांविरोधात नाराजी
चोरी केलेले सोने विकायला आलेल्या दोन संशयितांना सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्यांकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 91 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.बंडू पवार आणि उमेश काळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.या दोघांनी सोलापूर शहरातील विनायक नगर आणि बाळकोटे नगर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.
- जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील लंपी आजारातील जनावरांच्या आजार प्रतिबंध लस देण्याचे काम युद्ध पातळीवर
- जिल्ह्यात एकाच महिन्यात 1544 जनावरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव,1108 जनवारे झाली बरी
- जिल्ह्यातील 403 लंपी आजारग्रस्त जनावरांवर उपचार सुरू
- जिल्ह्यातील माळशिरस आणि माढा तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव
नंदुरबार जिल्ह्यातल्या नर्मदा नदीच्या काठावरील गावांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी होती बोट ॲम्बुलन्स तैनात ..
बोट अॅम्ब्युलन्स सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात....
नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर धरण क्षेत्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने आरोग्य विभागाच्या बोट अॅम्ब्युलन्सच्या मागील भागाचा सुमारे 30 टक्के भाग पाण्याखाली....
ही परिस्थिती निर्माण होताच आरोग्य विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले बचावकार्य सुरू....
या प्रकरणात पोलिसांकडून कोणता हलगर्जीपणा झालाय का याची चौकशी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आलीय....
चौकशी अंती पोलिसांकडून कोणताही हलगर्जीपणा झाल्या नसल्याचं एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अहवाल सादर करण्यात अलाय...
हे प्रकरण झाल्यानंतर पीडित महिलांनी ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती त्याचा देखील आज पुणे पोलिसांना अहवाल सादर होणार..
- अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या गाडीवर आमदार असणारा लोगो लावल्याचा प्रकार आला समोर
- आमदार नसतानाही गाडीवर आमदाराचा लोगो लावल्याने सोलापुर जिल्ह्यात चर्चेचा आले उधाण
- उमेश पाटील यांच्या एम एच 04 एच डी 5565 या नंबरच्या गाडीवर सोलापुरातील विश्रामगृह येथे आमदाराचा लोगो असल्याचे दिसून आले
- महाराष्ट्रातील 288 विधानसभा सदस्य आणि 78 विधान परिषद सदस्यांना शासकीय कामासाठी गाडीवर आमदाराचा लोगो लावण्याचा आहे अधिकार
- बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ करण्यात आला...
- प्रवाशांची संख्या आणि त्यांची मागणी लक्षात घेऊन मनपाच्या वाहतूक विभागाने नागपूरच्या सीताबर्डी ते बुटीबोरी गावापर्यंत आपली बसची सेवा सुरू केली आहे
- दररोज अर्ध्या तासाच्या अंतराने ही बस सेवा उपलब्ध राहणार आहे...
- नोकरीसाठी ये- जा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बससेवा उपयुक्त ठरणार आहे.
-नागपूर जिल्हा परिषदेचे सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये झाली होती, त्यावेळी ओबीसींचे एकूण 16 सदस्य होते
- मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर ओबीसींचे संख्याबळ 11 झाले
- आता न्यायालयाच्या नव्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेत पुन्हा 27 टक्के आरक्षण लागू होणार आहे
- त्यामुळे जिल्हा परिषदेच्या एकूण 57 जागांपैकी 15 जागा ओबीसींसाठी आरक्षित होतील
- यामुळे नागपूर जिल्हा परिषदेतील ओबीसी सदस्यांचे प्रतिनिधित्व पूर्वपदावर येणार आहे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पावलावर पाऊल ठेवत शिवसेना शिंदे गटाव्यक्तीलाअमराठी व्यक्तीला पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी नेमले आहे. शायना एन सी. यांची शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदावर निवड करण्यात आली आहे. एक वर्षासाठी ही निवड करण्यात आली असल्याचे शिवसेनेकडून काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सातारा वाईतील अनधिकृत दगडखान आणि स्टोन क्रशर विरोधात साताऱ्यातील कुसगांव, एकसर, व्याहाळी, वाई या गावातील ग्रामस्थांचा सातारा ते मंत्रालय असा तब्बल 230 किलोमीटर पायी मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्यात लाडक्या बहिणींचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असून, शासन आणि प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या असल्याचं त्यांनी सांगितलंय..या अनधिकृत दगड खाणीमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक तसेच प्राण्यांच्या जीवनमानावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतं आहे. तसेच खाणीत करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंग मध्ये तेथील स्थानिक नागरिकांच्या पाळीव प्राण्यांचा जीव देखील गेला असल्याचं या मोर्चेकऱ्यांच म्हणणं आहे.. तसेच हा मोर्चा मंत्रालयात जाऊन धडकणार असून एवढं करून देखील जर न्याय मिळाला नाही तर समस्त ग्रामस्थ मोर्चेकरी सामूहिक आत्मदहन करण्याचा ईशारा यावेळी मोर्चेकरी ग्रामस्थांनी दिलाय...
- अवसायनात गेलेल्या संस्थेकडून नाफेडची कांदा खरेदी
- अवसायनात गेलेल्या बाळासाहेब ठाकरे अटल नाविन्यपूर्ण सहकारी संस्थेकडून नाफेडची कांदा खरेदी
- जिल्हा उपनिबंधकांकडून नाफेडला नोटीस, तातडीनं कांदा खरेदी थांबवण्याचे निर्देश
- दरवर्षीप्रमाणेच यंदा देखील नाफेडच्या कांदा खरेदी अनियमितता?
- तर सिन्नर तालुक्यात २ केंद्रांवर जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाचे छापे
- प्रत्यक्ष खरेदी केलेला कांदा आणि चाळीत साठवलेल्या कांद्यात तफावत आढळली
- कांदा खरेदीत त्रुटी आढळल्याने नाफेडची कांदा खरेदी पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात
भारतीय डाक विभागाची सेवा आता जलद गतीने होणार असल्याने खातेदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.. बुलढाणा डाक विभागाच्या मुख्य कार्यालयामध्ये आज APT 2.0 अर्थात ॲडव्हान्स्ड पोस्टल टेक्नॉलॉजीचा शुभारंभ अधीक्षक गणेश अंभोरे यांच्या हस्ते पार पडला.. APT 2.0 प्रणाली ही भारतीय डाक विभागाची आधुनिक डिजिटल प्रणाली आहे, या प्रणालीमुळे भारतीय डाक विभागाला आता जलद सेवा देता येणार आहे..
गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे, चिखली तालुक्यातील काही धरबे गाव तलाव जेमतेम भरले आहेत , पेन टाकळी ओहरफ्लो झाले आहे अश्या अवस्थेत तालुक्यातील सावरखेड हे गाव पेनटाकळी धरण नजिक आहे मात्र गेल्या 6 महिन्यापासून मानवी संकटामुळे गावाला पाणी पुरवठा केल्या जात नसल्याने ग्रामस्थांना भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लगत असल्याचे चित्र समोर आले आहे... पाणी पट्टी कर भरला असून घर पट्टी कर काही जणांचे राहिले असल्या कारणाने सरपंच व ग्रामसेवकाने पाणी पुरवठा बंद केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.. अश्या मुजोर ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करताना दिसत आहे.. 1000 लोकवस्ती असलेल्या सावरखेड गावात नादुरस्त हातपंप आहे त्याला पाणी नाही, त्यामुळे कुठेतरी दूरवरील विहिरीचे पाणी आणण्यासाठी महिलांना भटकंती करावी लगत आहे.. तातडीने जिल्हा प्रशासनाने लक्ष देत ग्रामस्थांना पाणी पुरवठा करावा अशी मागणी सावरखेड येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे..
जालना जिल्ह्यामध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य मिळवणाऱ्या ज्या लाभार्थ्यांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यापासून धान्य मिळणार नाही. शासनाने यासंदर्भात कडक पावले उचलले असून सप्टेंबर महिन्यापासून केवळ केवायसी पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाच अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. जालना जिल्ह्यामध्ये अद्यापही जवळपास 3 लाख 54 हजार 887 लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यामुळे केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांचे अन्नधान्य सप्टेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर केवायसी करावी असं आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.
मनसेच्या बाळा नांदगावकरांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता...
तेव्हा दोन आक्टोंबर च्या मोर्चा संदर्भात शेतीच्या प्रश्नांवर भेटण्याचं बोलणं झालं होतं
आता योगायोगाने सहा तारखेला मी मुंबईत आहे त्यामुळे राज ठाकरेंसोबत भेट होईल
राजकारण हा वेगळा विषय आहे आणि भेटीगाठी हा वेगळा विषय आहे
अगामी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात वर्गणी गोळा करताना धर्मादाय कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.
अन्यथा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा कलम ६६ क नुसार तीन महिने कारावासाची शिक्षा आणि विनापरवानगी जमा केलेल्या रकमेच्या दीडपट दंडाची तरतूद आहे.
ज्या मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे कायमस्वरूपी नोंदणी केली आहे, त्यांना वेगळ्या परवानगी आवश्यकता नाही.
मात्र, सर्व आर्थिक वर्षांची हिशोबपत्रके ऑनलाइन दाखल करणे बंधनकारक आहे.
नोंदणीकृत नसलेली मंडळे आणि संस्थांनी ट्रस्ट कायद्याच्या कलम ४१ क अन्वये वर्गणी गोळा करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे.
आरोपी वाल्मीक कराड ने आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी नसल्याचा अर्ज बीड विशेष न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता वाल्मिक कराडने आता वकिलांच्या मार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोष मुक्तीच्या अर्ज संदर्भात आणि दोषारोप पत्रासंदर्भात उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केल्याची माहिती साम टीव्ही ला सूत्रांनी दिली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडने वकिलांच्या मार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या होलार समाज आर्थिक विकास महामंडळासाठी 50 कोटी रूपयांची आर्थिक तरतूद केली जाईल अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी केली आहे. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे होलार समाज मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन मंत्री शिरसाठ यांच्या झाले. यावेळी त्यांनी होलार समाज आर्थिक विकास महामंडळासाठी निधीची घोषणा केली. यावेळी मंत्री भरत गोगावले उपस्थित होते.
अजित पवार मुख्यमंत्री होई पर्यंत आपण गप्प बसायचं नाही,असे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एकमेव पार्टी आहे, जी युती मध्ये असून देखील छत्रपती, शाहू, फुले आणि आंबेडकरांचा पुरोगामी विचार सोडला नाही,असं मत देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे.ते सांगलीच्या आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्यावतीने आयोजित युवा संवाद मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.
कराडच्या प्रीतीसंगम परिसरात कृष्णा- कोयना नदीच्या काठी मगरीचे वास्तव्य असून ड्रोनमधून हालचाल टिपण्यात आली आहे. मगरीच्या या वास्तव्यामुळे नागरिकांच्यात तसेच पोहायला जाणाऱ्या लोकांच्यात मोठे भीतीचे वातावरण आहे. आज ड्रोनच्या साहाय्याने केलेल्या चित्रीकरणात मगरीचे स्पष्ट दृश्य टिपले गेले असून, या दृष्यांनी परिसरात खळबळ उडाली आहे.
कोयना व कृष्णा नदीच्या संगमावर असलेल्या प्रीतीसंगमाला दररोज शेकडो पर्यटक, भाविक आणि स्थानिक नागरिक भेट देत असतात. ड्रोन चित्रीकरणात मगर नदीत शांतपणे तरंगताना व एका जागी स्थिरावलेली दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.