बुलढाणा : उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होत असते. उन्हाळ्याचे साधारण दोन- अडीच महिने टंचाईला सामोरे जावे लागल्यानंतर पावसाळ्यात पाण्याची समस्या कमी होत असते. मात्र पावसाळ्याचे दोन महिने उलटून देखील गावात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र चिखली तालुक्यातील सावरखेड गावात पाहण्यास मिळत आहे. यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
गेल्या दोन महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. शिवाय मे महिन्यातील अवकाळी पावसाने देखील सर्वत्र पाण्याची समस्या दूर झाली होती. दरम्यान चिखली तालुक्यातील काही धरणे, गाव तलाव जेमतेम भरले आहेत. तर पेन टाकळी ओव्हरफ्लो झाले आहे. अश्या अवस्थेत तालुक्यातील सावरखेड हे गाव पेनटाकळी धरण नजिक असताना देखील गावात भर पावसाळ्यात देखील पाणीटंचाई जाणवत आहे.
सहा महिन्यांपासुन समस्या कायम
गेल्या ६ महिन्यापासून मानवी संकटामुळे गावाला पाणी पुरवठा केला जात नसल्याने ग्रामस्थांना भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लगत असल्याचे चित्र समोर आले आहे. पाणीपट्टी कर भरला असून घरपट्टी कर काही जणांचे राहिले आहे. या कारणाने सरपंच व ग्रामसेवकाने पाणी पुरवठा बंद केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. अश्या मुजोर ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करताना दिसत आहे.
विहिरीवरून आणावे लागतेय पाणी
साधारण १ हजार लोकवस्ती असलेल्या सावरखेड गावात नादुरस्त हातपंप आहे. त्याला पाणी नाही. त्यामुळे कुठेतरी दूरवरील विहिरीचे पाणी आणण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. याबाबत तातडीने जिल्हा प्रशासनाने लक्ष देत ग्रामस्थांना पाणी पुरवठा करावा; अशी मागणी सावरखेड येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.