रोहित कदम, साम टीव्ही
स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत सिमेंटचे रस्ते आणि पेव्हर ब्लॉकच्या विळख्यात आज मुंबईकरांचा श्वास पार गुदमरून गेलाय. अशातच आता मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच सरीत मुंबईच्या काही भागांत पाणी साचलं..पावसात मुंबई जलमय होणं हे गेल्या काही वर्षांपासून कायमच चित्र आहे आणि दरवर्षी यात वाढच होतेय. याच महत्वाचं कारण आहे शहराचं वाढत काँक्रिटीकरण..
मुंबईतल्या 66 टक्के रस्त्यांच्या बाजूला पेव्हर ब्लॉक बसवण्यात आलेत. तसंच, 60 टक्क्यांहून अधिक जमीन सिमेंटच्या थराखाली गाडली गेलीये. तर शहरातील 81 टक्के मातीची जमीनच नष्ट झालीये. इतकंच नव्हे तर मुंबईतील पुनर्रोपण केलेली 70 टक्के झाडं नष्ट झालीयेत.
याच क्रॉकीटचा परिणाम तापमानवाढीवर झालाय. कधी काळी कमाल तापमान जास्तीत जास्त २५ पर्यंत असणाऱ्या मुंबईतील तापमान आता ३९- ४० डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलय.
मुंबईत ७० टक्के कॉक्रीटीकरण झालंय ..आणि याचेच परिणाम आता दिसू लागेल आहेत. उन्हाळ्यातल्या तापमान वाढीनंतर आता पाणी शोषण क्षमताही कमी झाल्यानं पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणं ही कठीण असेल..त्यामुळे या पावसाळ्यातही मुंबईची तुंबई झालेली दिसली तर त्यात विशेष काही नाही....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.