Mumbai Accident News Yandex
मुंबई/पुणे

Mumbai Accident : ड्युटी संपवून घरी जात होते आजोबा; पाठीमागून स्कूल बस आली अन्...

Dahisar Accident News : ड्युटी संपवून घरी पायी निघालेल्या ७१ वर्षीय सुरक्षा रक्षकाला स्कूल बसने धडक दिली. यात जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. दहीसरमध्ये ही दुर्घटना घडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या ७१ वर्षीय वृद्धाचा स्कूलबसच्या धडकेत मृत्यू झाला. ते नाइट शिफ्ट संपवून पायी घराकडे निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली. घटनेनंतर काही वेळाने स्कूल बसचालकाला अटक करण्यात आली आहे.

मोहन मुदिक असं मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होते. बुधवारी ते रात्रपाळीवर होते. गुरुवारी सकाळी ते कामावरून घरी पायी जात होते. त्याचवेळी त्यांना पाठिमागून येणाऱ्या स्कूलबसने धडक दिली. यात ते जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास दहिसर पूर्वेकडील अशोकवन परिसरात झाला. बोरिवली पूर्वेकडे काजुपाडा परिसरात राहणारे मुदिक यांचा या अपघातात मृत्यू झाला.

मुदिक हे सकाळी ड्युटीवरून घरी पायी जात होते. त्याचवेळी अरविंद गणपत कापसे हा स्कूलबस घेऊन निघाला होता. तिथल्याच एका स्टॉपवरुन त्याने शाळेतल्या मुलांना बसमध्ये बसवले आणि तो निघाला. त्याचवेळी त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. पायी जाणाऱ्या मुदिक यांना बसची जोरदार धडक बसली. अपघातानंतर कापसे याने एक रिक्षा थांबवली. पायी जाणाऱ्या लोकांच्या मदतीने त्याने मुदिक यांना रिक्षात बसवले आणि शताब्दी रुग्णालयात नेले. मुदिक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर कापसे तेथून निघून गेला.

पोलिसांनी सांगितले की, या अपघाताच्या घटनेबाबत रुग्णालयातून माहिती मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी बसचालक कापसे याला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Independence Day Marathi Speech : १५ ऑगस्टला भाषण देताय? हे 10 मुद्दे लक्षात ठेवा; भाषण ऐकून सर्वच करतील कौतुक!

चोरांनी रात्री दुकान फोडलं, २२ किलो चांदी लंपास केली; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Crime News: पुण्यातील फेमस रीलस्टारला अटक; ५ हजारांहून अधिक बँक खात्यांतून १० कोटींचं मनी ट्रेल, हाँगकाँग कनेक्शन उघड

बीड पुन्हा हादरलं! पेट्रोलपंपाजवळ गोळीबाराचा थरार; वाल्मीक कराड कनेक्शन आलं समोर

Mumbai : पाणी टंचाईची कटकट संपली! मुंबईच्या तलावांमध्ये ८९.४९ टक्के पाणीसाठा, कोणते तलाव किती भरले? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT