Mahavikas Aghadi  Saam tv
मुंबई/पुणे

Mahavikas Aghadi : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर; सत्यजित तांबेंची हकालपट्टी!

पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी अखेर महाविकासआघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी अखेर महाविकासआघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रीत बैठक घेत आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली. यामध्ये सत्यजित तांबेंना काँग्रेसकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. तसेच त्यांचं पक्षातून निलंबनही करण्यात आलं आहे.  (Latest Marathi News)

राज्यात मागच्या काही दिवसांपासून पदवीधर मतदार संघाच्या विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणुकीची बिगुल वाजल्यापासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलेच वातावरण तापलेले पाहायला मिळाले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांनी पक्षाचा आदेश झुगारून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  (Maharashtra Political News)

सत्यजित तांबेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेस काही काळ बँकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आता पक्षाने थेट तांबे यांच्यावर कारवाई करत त्यांचं निलंबन केलं आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

महाविकासआघाडीकडून ५ उमेदवार जाहीर

पदवीधर मतदारसंघाच्या जागांसाठी महाविकासआघाडीने (Mahavikas Aghadi) आपले पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये नाशिकमधून शुभांगी पाटील, नागपूर- सुधाकर आडबाले, कोकण- बाळाराम पाटील, औरंगाबाद- विक्रम काळे, अशी नावे घोषीत करण्यात आली आहेत. यावेळी काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार उपस्थित होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT